शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

गत हंगामाएवढीच ‘एफआरपी’ मिळणार

By admin | Updated: April 13, 2016 02:44 IST

आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे.

कोल्हापूर : आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे. कृषी मूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.कृषी मूल्य आयोगाच्या आॅगस्टमध्ये झालेल्या बैठकीत आगामी २०१६-१७ या हंगामातील ‘एफआरपी’ किती असावी, यावर निर्णय झालेला होता. त्याप्रमाणे ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन २३०० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. चालू २०१५-१६ या हंगामासाठी असणारी ‘एफआरपी’ कायम ठेवण्यात आली होती; पण कृषी मूल्य आयोगाने ‘एफआरपी’मध्ये घट केली असून, ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास १४६ रुपये देण्यात येणार असल्याची चर्चा साखर कारखानदारांच्या वर्तुळात सुरू होती. आगामी गळीत हंगामातील ‘एफआरपी’बाबत प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र पाल यांच्याशी संपर्क साधला असता, ‘एफआरपी’मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आयोगाच्या सदस्यांनी शिफारस केलेल्या ‘एफआरपी’ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी हंगामात ९.५ उताऱ्यास २३०० रुपये, तर त्यापुढील टक्क्यास २४२ रुपयेच मिळणार आहेत. - खासदार राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)