शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

गत हंगामाएवढीच ‘एफआरपी’ मिळणार

By admin | Updated: April 13, 2016 02:44 IST

आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे.

कोल्हापूर : आगामी हंगामात गाळपास येणाऱ्या उसास यावर्षीप्रमाणेच म्हणजे ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये व त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये असा दर कायम राहणार आहे. कृषी मूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.कृषी मूल्य आयोगाच्या आॅगस्टमध्ये झालेल्या बैठकीत आगामी २०१६-१७ या हंगामातील ‘एफआरपी’ किती असावी, यावर निर्णय झालेला होता. त्याप्रमाणे ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन २३०० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २४२ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. चालू २०१५-१६ या हंगामासाठी असणारी ‘एफआरपी’ कायम ठेवण्यात आली होती; पण कृषी मूल्य आयोगाने ‘एफआरपी’मध्ये घट केली असून, ९.५ टक्के साखर उताऱ्यास २३०० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास १४६ रुपये देण्यात येणार असल्याची चर्चा साखर कारखानदारांच्या वर्तुळात सुरू होती. आगामी गळीत हंगामातील ‘एफआरपी’बाबत प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र पाल यांच्याशी संपर्क साधला असता, ‘एफआरपी’मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आयोगाच्या सदस्यांनी शिफारस केलेल्या ‘एफआरपी’ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी हंगामात ९.५ उताऱ्यास २३०० रुपये, तर त्यापुढील टक्क्यास २४२ रुपयेच मिळणार आहेत. - खासदार राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)