शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

केंद्राने ठरविलेला एफआरपी योग्यच

By admin | Updated: May 7, 2016 01:56 IST

केंद्र सरकारने उसाचा हमीभाव (एफआरपी) ठरविताना अवलंबिलेल्या निर्णय प्रक्रियेत काही चुकीचे वाटत नाही, असे मत व्यक्त करून औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी हमीभावात हस्तक्षेप करण्यास

औरंगाबाद : केंद्र सरकारने उसाचा हमीभाव (एफआरपी) ठरविताना अवलंबिलेल्या निर्णय प्रक्रियेत काही चुकीचे वाटत नाही, असे मत व्यक्त करून औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी हमीभावात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. एफआरपी निश्चित करण्याचा कालावधी कमी करता येईल का, याबाबत केंद्राने अंतिम निर्णय घ्यावा, असे खंडपीठाने सुचविले.केंद्र शासनाने २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ९.५ उताऱ्यावर २२० रुपये प्रतिक्विंटल असा रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) ठरविला होता. मात्र, त्याला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, मांजरा, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, भीमाशंकर, महाराष्ट्र शेतकरी, सिद्धी कारखाना, जागृती शुगर, गंगामाई शुगर, रेणुका, गंगाखेड शुगर या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.एफआरपी ठरविताना केंद्राने कारखान्यांची बाजू ऐकली नाही, सुनावणीची संधी दिली नाही, साखरेचा उत्पादन खर्च विचारात घेतला नाही, साखरेचे दर कमी झाल्याने एफआरपी देणे शक्य नाही, रंगराजन समितीच्या शिफारशी विचारात घेतल्या गेल्या नाहीत, असे मुद्दे उपस्थित करून एफआरपी रद्द करण्याची विनंती केली होती. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. बदर यांनी केंद्राने ठरविलेला एफआरपी योग्य असल्याचा निर्वाळा दिला.असा ठरतो हमीभाव...उसाचा हमीभाव ठरविताना ऊस तोडणीचा खर्च, वाहतूक खर्च, साखर उत्पादनाचा खर्च, शेतकऱ्याला पर्यायी पीक उत्पादनातून किती उत्पन्न मिळू शकते, शेती उत्पादनाच्या भावाचा ट्रेंड काय, ग्राहकाला वाजवी भावात साखर मिळावी, साखरेची विक्री किंमत, साखरेचा उतारा, मुख्य म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांस योग्य मोबदला मिळावयास हवा, याचा एकत्रित विचार करून सीएसीपी आयोगाने उसाचा हमीभाव ठरविला.