शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

केंद्राने ठरविलेला एफआरपी योग्यच

By admin | Updated: May 7, 2016 01:56 IST

केंद्र सरकारने उसाचा हमीभाव (एफआरपी) ठरविताना अवलंबिलेल्या निर्णय प्रक्रियेत काही चुकीचे वाटत नाही, असे मत व्यक्त करून औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी हमीभावात हस्तक्षेप करण्यास

औरंगाबाद : केंद्र सरकारने उसाचा हमीभाव (एफआरपी) ठरविताना अवलंबिलेल्या निर्णय प्रक्रियेत काही चुकीचे वाटत नाही, असे मत व्यक्त करून औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी हमीभावात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. एफआरपी निश्चित करण्याचा कालावधी कमी करता येईल का, याबाबत केंद्राने अंतिम निर्णय घ्यावा, असे खंडपीठाने सुचविले.केंद्र शासनाने २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ९.५ उताऱ्यावर २२० रुपये प्रतिक्विंटल असा रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) ठरविला होता. मात्र, त्याला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, मांजरा, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, भीमाशंकर, महाराष्ट्र शेतकरी, सिद्धी कारखाना, जागृती शुगर, गंगामाई शुगर, रेणुका, गंगाखेड शुगर या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.एफआरपी ठरविताना केंद्राने कारखान्यांची बाजू ऐकली नाही, सुनावणीची संधी दिली नाही, साखरेचा उत्पादन खर्च विचारात घेतला नाही, साखरेचे दर कमी झाल्याने एफआरपी देणे शक्य नाही, रंगराजन समितीच्या शिफारशी विचारात घेतल्या गेल्या नाहीत, असे मुद्दे उपस्थित करून एफआरपी रद्द करण्याची विनंती केली होती. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. बदर यांनी केंद्राने ठरविलेला एफआरपी योग्य असल्याचा निर्वाळा दिला.असा ठरतो हमीभाव...उसाचा हमीभाव ठरविताना ऊस तोडणीचा खर्च, वाहतूक खर्च, साखर उत्पादनाचा खर्च, शेतकऱ्याला पर्यायी पीक उत्पादनातून किती उत्पन्न मिळू शकते, शेती उत्पादनाच्या भावाचा ट्रेंड काय, ग्राहकाला वाजवी भावात साखर मिळावी, साखरेची विक्री किंमत, साखरेचा उतारा, मुख्य म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांस योग्य मोबदला मिळावयास हवा, याचा एकत्रित विचार करून सीएसीपी आयोगाने उसाचा हमीभाव ठरविला.