शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केंद्राने ठरविलेला एफआरपी योग्यच

By admin | Updated: May 7, 2016 01:56 IST

केंद्र सरकारने उसाचा हमीभाव (एफआरपी) ठरविताना अवलंबिलेल्या निर्णय प्रक्रियेत काही चुकीचे वाटत नाही, असे मत व्यक्त करून औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी हमीभावात हस्तक्षेप करण्यास

औरंगाबाद : केंद्र सरकारने उसाचा हमीभाव (एफआरपी) ठरविताना अवलंबिलेल्या निर्णय प्रक्रियेत काही चुकीचे वाटत नाही, असे मत व्यक्त करून औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी हमीभावात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. एफआरपी निश्चित करण्याचा कालावधी कमी करता येईल का, याबाबत केंद्राने अंतिम निर्णय घ्यावा, असे खंडपीठाने सुचविले.केंद्र शासनाने २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ९.५ उताऱ्यावर २२० रुपये प्रतिक्विंटल असा रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) ठरविला होता. मात्र, त्याला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, मांजरा, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, भीमाशंकर, महाराष्ट्र शेतकरी, सिद्धी कारखाना, जागृती शुगर, गंगामाई शुगर, रेणुका, गंगाखेड शुगर या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.एफआरपी ठरविताना केंद्राने कारखान्यांची बाजू ऐकली नाही, सुनावणीची संधी दिली नाही, साखरेचा उत्पादन खर्च विचारात घेतला नाही, साखरेचे दर कमी झाल्याने एफआरपी देणे शक्य नाही, रंगराजन समितीच्या शिफारशी विचारात घेतल्या गेल्या नाहीत, असे मुद्दे उपस्थित करून एफआरपी रद्द करण्याची विनंती केली होती. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. बदर यांनी केंद्राने ठरविलेला एफआरपी योग्य असल्याचा निर्वाळा दिला.असा ठरतो हमीभाव...उसाचा हमीभाव ठरविताना ऊस तोडणीचा खर्च, वाहतूक खर्च, साखर उत्पादनाचा खर्च, शेतकऱ्याला पर्यायी पीक उत्पादनातून किती उत्पन्न मिळू शकते, शेती उत्पादनाच्या भावाचा ट्रेंड काय, ग्राहकाला वाजवी भावात साखर मिळावी, साखरेची विक्री किंमत, साखरेचा उतारा, मुख्य म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांस योग्य मोबदला मिळावयास हवा, याचा एकत्रित विचार करून सीएसीपी आयोगाने उसाचा हमीभाव ठरविला.