शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आघाडीत आगपाखड

By admin | Updated: May 24, 2014 02:34 IST

पराभवाचे स्वतंत्रपणे चिंतन करीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील मित्रपक्षांनी पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत परस्परांवर झोड उठविली आहे

मुंबई : भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही झालेल्या पराभवाचे स्वतंत्रपणे चिंतन करीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील मित्रपक्षांनी पराभवाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत परस्परांवर झोड उठविली आहे. शुक्रवारी दिवसभर आघाडीतील दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. बैठका-मेळाव्यांचा सिलसिला अखंड जारी होता. टिळक भवन येथे आज सलग दुस-या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत चिंतन बैठका झाल्या. यावेळी कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राणे यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादीही जबाबदार असल्याचे सांगत राणे यांनी मित्रपक्षाला धारेवर धरले. त्यामुळे अंतर्गत धूसफूस, मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या अधिकार क्षेत्र, अशा वादात अडकलेल्या काँग्रेसच्या बैठकीचा नूरच सायंकाळी पालटला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मनातील खदखद पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत व्यक्त केली. काँग्रेसने पवारांशी कधीही राजकीय चर्चा केली नाही, ज्यांनी घटक पक्षांची बाजू मांडायला हवी होती, ते डॉ. मनमोहन सिंग गेल्या दोन महिन्यांत दिसलेच नाहीत. संपुआवर टूजीपासून कोळसा पट्टे वाटपापर्यंत अनेक विषयात सातत्याने खोटे आरोप झाले, तरी डॉ. सिंग यांनी स्पष्ट शब्दांत बचाव केला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी) मागील खेपेस पर्याय नव्हता. पण आता चित्र बदलले आहे, असे सांगत पवारांनी जास्त जागांचा आग्रह रेटण्यास सुरुवात केली आहे. जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीला बदल हवा असेल तर त्यांनी काँग्रेसकडून कडून घेतलेल्या जागा परत कराव्यात, असा टोला राणे यांनी हाणला.