शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत मोर्चा

By admin | Updated: July 27, 2016 23:45 IST

राज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - राज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान असा पहिला धडक मोर्चा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने काढल्याचा दावा केला आहे. बुधवारी काढलेल्या मोर्चाचे रूपांतर आजाद मैदानात जाहीर सभेत झाले. या वेळी अ‍ॅड. सुरेश माने यांनी सरकारवर टीका करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.माने म्हणाले की, स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन देत भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. मात्र, ते आश्वासन पूर्ण करण्याऐवजी सरकार कारणे देत आहे. छोट्या राज्याच्या रूपात विदर्भाचा विकास व्हावा, एवढी माफक अपेक्षा आहे. विदर्भ मागासलेला आहे, म्हणून विकासाचा अनेक क्षेत्रांत अनुशेष बाकी आहे. मात्र, मराठवाडा तर अति मागासलेला असून, रोजगार नियोजन, जलव्यवस्थापन, उद्योग व वीज, रस्ते, शेतीपंप अशा विविध सुविधांपासून मराठवाड्यातील लोक वंचित आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाप्रमाणे लवकरच स्वतंत्र मराठवाड्याची मागणी होण्यासाठी मराठवाडा आर्थिक विकास कार्यक्रम राबवण्याची मागणी त्यांनी केली.मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची मागणी माने यांनी केली. तसे शक्य नसल्यास १५ लाख रुपयांपर्यंतचे सामान्य नागरिकांचे कर्ज माफ करा, असेही ते म्हणाले. याशिवाय सच्चर समिती, प्रा. कुंडू समिती, रहेमान समिती आणि रंगनाथ मिश्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली......................या मोर्चात धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आवामी विकास पार्टीचे अध्यक्ष समशेर खान पठाण, निवृत्ती ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. तरी सोमवारी संगणक परिचालकांनी सीएसटी येथे केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे, राणीबाग येथून मोर्चा काढण्यास आयोजकांना पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे भायखळा पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयोजकांसोबत चर्चा करत मोर्चा काढण्यास परवानगी दिली.