शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

निवडणुकीत आघाडी ?

By admin | Updated: June 30, 2016 03:09 IST

काँग्रेससोबत आघाडी करणे हिताचे ठरणार असून त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेणार

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचे पॅनल होत असल्याने काँग्रेससोबत आघाडी करणे हिताचे ठरणार असून त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. आघाडीसाठी सध्या काही स्थानिक मंडळी तयार नसली तरीदेखील राणेंच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी आघाडीसाठी हात पुढे करील, असे संकेत त्यांनी ‘लोकमत’ला दिले.जेमतेम सहा महिन्यांवर येऊ घातलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रवादीत कशा पद्धतीने बदल केले जातील, आघाडी होईल अथवा नाही, रणनीती कशी असेल, सोशल मीडियाचा वापर कसा केला जाईल, अशा काही महत्त्वाच्या विषयांवर परांजपे यांनी माहिती दिली. मागील महिन्यात झालेल्या परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहिली होती. तसेच मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीपासून वेगळी चूल मांडण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्याबाबत परांजपे यांना छेडले असता त्यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यानुसार, पुढील आठवड्यातच यासंदर्भात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काहीसे वेगळे वातावरण होते, त्यामुळे दोघांनीही स्वतंत्र निवडणूक लढवली होती. परंतु, आता शिवसेना आणि भाजपाला शह द्यायचा असेल आणि पॅनल पद्धतीत तग धरून राहायचे असेल तर आघाडी करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे राणे यांच्यावर ज्या वेळेस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली, त्याच वेळेस त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यासंदर्भातील सूतोवाचही केले होते. त्यानुसार, आता राष्ट्रवादीनेदेखील आघाडीबाबत चाचपणी सुरू केल्याचे परांजपे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)>नाराजांची मनधरणी करणार; पक्ष एकसंधपक्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी जे नाराज झाले असतील, त्या सर्वांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचे कामही केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नगरसेवकाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली जात आहे. याशिवाय, यापूर्वी सोशल मीडियाच्या जबाबदारीचा अनभुव असल्याने आगामी निवडणुकीतदेखील याचा वापर करून राष्ट्रवादीला एकसंध ठेवले जाईल आणि विकासकामांचा अजेंडा ठाणेकरांपुढे नेला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.