शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

निवडणुकीत आघाडी ?

By admin | Updated: June 30, 2016 03:09 IST

काँग्रेससोबत आघाडी करणे हिताचे ठरणार असून त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेणार

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचे पॅनल होत असल्याने काँग्रेससोबत आघाडी करणे हिताचे ठरणार असून त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. आघाडीसाठी सध्या काही स्थानिक मंडळी तयार नसली तरीदेखील राणेंच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी आघाडीसाठी हात पुढे करील, असे संकेत त्यांनी ‘लोकमत’ला दिले.जेमतेम सहा महिन्यांवर येऊ घातलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रवादीत कशा पद्धतीने बदल केले जातील, आघाडी होईल अथवा नाही, रणनीती कशी असेल, सोशल मीडियाचा वापर कसा केला जाईल, अशा काही महत्त्वाच्या विषयांवर परांजपे यांनी माहिती दिली. मागील महिन्यात झालेल्या परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहिली होती. तसेच मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीपासून वेगळी चूल मांडण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्याबाबत परांजपे यांना छेडले असता त्यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यानुसार, पुढील आठवड्यातच यासंदर्भात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काहीसे वेगळे वातावरण होते, त्यामुळे दोघांनीही स्वतंत्र निवडणूक लढवली होती. परंतु, आता शिवसेना आणि भाजपाला शह द्यायचा असेल आणि पॅनल पद्धतीत तग धरून राहायचे असेल तर आघाडी करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे राणे यांच्यावर ज्या वेळेस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली, त्याच वेळेस त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यासंदर्भातील सूतोवाचही केले होते. त्यानुसार, आता राष्ट्रवादीनेदेखील आघाडीबाबत चाचपणी सुरू केल्याचे परांजपे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)>नाराजांची मनधरणी करणार; पक्ष एकसंधपक्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी जे नाराज झाले असतील, त्या सर्वांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचे कामही केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नगरसेवकाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली जात आहे. याशिवाय, यापूर्वी सोशल मीडियाच्या जबाबदारीचा अनभुव असल्याने आगामी निवडणुकीतदेखील याचा वापर करून राष्ट्रवादीला एकसंध ठेवले जाईल आणि विकासकामांचा अजेंडा ठाणेकरांपुढे नेला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.