शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजपाच्या जागांवर मित्रपक्षांचे अर्ज

By admin | Updated: September 28, 2014 02:31 IST

भारतीय जनता पार्टीने आपले 261 उमेदवार जाहीर केले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी व शिवसंग्राम या पक्षांना 27 जागा सोडण्यात आलेल्या आहेत.

मुंबई : भारतीय जनता पार्टीने आपले 261 उमेदवार जाहीर केले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी व शिवसंग्राम या पक्षांना 27 जागा सोडण्यात आलेल्या आहेत. परंतु या मित्रपक्षांनी अर्ज दाखल करण्याबाबत केलेले दावे पाहिले तर भाजपाच्या वाटय़ाच्या किमान सात जागांवर मित्रपक्षांनी अर्ज केले आहेत. पुढील दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
भाजपाच्या नेत्यांबरोबर शनिवारी रिपाइंच्या रामदास आठवले यांची बैठक झाली. त्यांना आठ जागा सोडण्याचा निर्णय झाल्याचे व केंद्रात मंत्रीपदासह राज्यातील सत्तेत 1क् टक्के वाटा देण्याचे निश्चित झाल्याचे आठवले यांनी सांगितले.        
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, इस्लामपूर, कराड उत्तर आदि 15 मतदारसंघात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टीला मांड, दौंड, भूम-परांडा, गंगाखेड, कळमनुरी, देगलूर, पैठण, कन्नड, पारनेर, इंदापूर हे मतदारसंघ सुटल्याचे त्या पक्षाने सांगितले. 
 
आठवले यांना चेंबूर, विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पुणो कॅन्टॉनमेंट, मुंब्रा, अंबरनाथ, देवळाली व भांडूप या आठ जागा सोडण्यात आल्याचे त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले. याखेरीज अंधेरी पूर्व मतदारसंघातून रिपाइंच्या वतीने एन्काऊंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी अर्ज केला असून तेथे भाजपाने उमेदवार दाखल केला आहे.