शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

वीजपुरवठा होतोय वारंवार खंडित

By admin | Updated: March 1, 2017 01:32 IST

धानोरी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

विश्रांतवाडी : धानोरी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्याने आणि उन्हाळ्यापूर्वीच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.मागील अनेक महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अद्याप उन्हाळा सुरू व्हायचा आहे, तर ही परिस्थिती आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तर बारावीची बोर्ड परीक्षा सुरू आहे, अशात वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. रात्री-अपरात्री अथवा दिवसाही वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणकडे चौकशी केल्यानंतर प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितली जातात, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. धानोरी परिसराची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. या परिसरात स्थानिक नागरिकांबरोबरच आयटी, बँक व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी, बाहेर राज्यांतून आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. याबाबत महावितरणचे धानोरी शाखेच्या कनिष्ठ अभियंत्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. तर विश्रांतवाडी केंद्राच्या प्रमुखांनीही असमर्थता दर्शवली.(वार्ताहर)>परीक्षाकाळात वीजपुरवठा सुरळीत राहावाया परिसरात अनेक रुग्णालये व शाळाही आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने या सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागतो. बारावी परीक्षेच्या काळात तरी वीजपुरवठा सुरळीत राहावा, एवढीच नागरिकांची माफक अपेक्षा आहे.