शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वीजपुरवठा होतोय वारंवार खंडित

By admin | Updated: March 1, 2017 01:32 IST

धानोरी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

विश्रांतवाडी : धानोरी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्याने आणि उन्हाळ्यापूर्वीच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.मागील अनेक महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अद्याप उन्हाळा सुरू व्हायचा आहे, तर ही परिस्थिती आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तर बारावीची बोर्ड परीक्षा सुरू आहे, अशात वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. रात्री-अपरात्री अथवा दिवसाही वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणकडे चौकशी केल्यानंतर प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितली जातात, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. धानोरी परिसराची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. या परिसरात स्थानिक नागरिकांबरोबरच आयटी, बँक व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी, बाहेर राज्यांतून आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. याबाबत महावितरणचे धानोरी शाखेच्या कनिष्ठ अभियंत्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. तर विश्रांतवाडी केंद्राच्या प्रमुखांनीही असमर्थता दर्शवली.(वार्ताहर)>परीक्षाकाळात वीजपुरवठा सुरळीत राहावाया परिसरात अनेक रुग्णालये व शाळाही आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने या सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागतो. बारावी परीक्षेच्या काळात तरी वीजपुरवठा सुरळीत राहावा, एवढीच नागरिकांची माफक अपेक्षा आहे.