शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

शिक्षकांचे स्वातंत्र्यच हिरावले गेले !

By admin | Updated: November 4, 2016 03:23 IST

आम्ही शालेय शिक्षण घेत होतो तो आणि आजचा काळ यात फरक आहे.

ठाणे : आम्ही शालेय शिक्षण घेत होतो तो आणि आजचा काळ यात फरक आहे. आज काळ बदलला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत दोन-तीन वेळा शिक्षा केली की त्याचे पालक शिक्षकांना जाब विचारतात. हल्ली शाळांमधून होणाऱ्या पॅरेंटस् मिटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीपेक्षा पालक शिक्षकांनाच आमच्या मुलाला कमी मार्कस् का दिले, कार्यक्रमात का घेतले नाही, असे प्रश्नच जास्त विचारतात. पूर्वीच्या शिक्षकांना जे स्वातंत्र्य होते ते आजच्या शिक्षकांकडे दिसत नाही. त्यांचे स्वातंत्र्यच हिरावून घेतले आहे, असे परखड मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्यात व्यक्त केले.मो. ह. विद्यालयच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा शुभारंभ बुधवारी शाळेच्या प्रांगणात झाला. २ नोव्हेंबर २०१६ ते २ नोव्हेंबर २०१७ असे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्याचा शुभारंभ बुधवारी झाला. बाळासाहेब चितळे या समारंभाचे अध्यक्ष होते. तर विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले अभय ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मो.ह.विद्यालय कधीही उच्चभ्रू समाजाची शाळा म्हणून ओळखली गेली नाही. सर्व समाज, स्तरातील विद्यार्थ्यांना या शाळेने, शाळेतील शिक्षकांनी आपलेसे केले. आम्ही आमच्या काळातील शिक्षकांचे इतके कौतुक करतो म्हणून आजच्या शिक्षकांना कमी लेखून चालणार नाही. त्याकाळी एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा केली की शिक्षकांनी योग्य कारणास्तवच केली असेल यावर पालक ठाम असायचे. किंबहुना काही पालक तुम्ही आमच्या पाल्याला अधिक शिक्षा करा पण त्याला शिस्त लावा, असे सांगायचे. मात्र, आजची परिस्थिती तशी नाही. १९६०-७० च्या दशकातील मापदंड आताच्या शिक्षकांना लावले तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल, असेही ओक म्हणाले. या कार्यक्रमाला शाळेचे माजी-आजी शिक्षक, विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शाळेचे माजी विद्यार्थी असलेले आणि आज विविध क्षेत्रात यशवंत ठरलेल्या राजगोपाल नोकजा, न्यायमूर्ती विजय टिपणीस, हेमचंद्र प्रधान, संजय जाधव, नुबैरशाह शेख, डॉक्टर आनंद घैसास, चंद्रशेखर वावीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य राजेंद्र राजपूत, रविकांत ठाणावाला, श्रीकृष्ण अक्षीकर, रविंद्र तामरस, बाळासाहेब खोल्लम, सुनील पाटील, प्रदीप राका आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)