शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार

By admin | Updated: August 6, 2015 01:57 IST

दरोडेखोर, संघटित गुंडांशी लढताना पोलिसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या मोफत कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे

जमीर काझी ल्ल मुंबईदरोडेखोर, संघटित गुंडांशी लढताना पोलिसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या मोफत कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. संबंधितांच्या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत त्यांच्या पात्र वारसांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येणार आहे.या संदर्भातील प्रस्ताव लवकरच राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ९ वर्षांपासून विविध आजारांवर नामांकित हॉस्पिटलांमध्ये पूर्णपणे मोफत (कॅशलेस) उपचाराची सुविधा आहे. मात्र संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी हयात असेपर्यंतच ही सुविधा होती. पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या पोलीस कल्याण निधी समिती बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला गृह विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पुढाकारामुळे १९ मार्च २००५ साली राज्य सरकारने पोलिसांसह कुटुंबीयांना पूर्णपणे मोफत उपचार व औषधोपचार पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी साध्या व गंभीर स्वरूपाच्या ३० आजारांची निश्चिती करून प्रत्येक जिल्ह्यातील विविध विकारांबाबतच्या तज्ज्ञ व आवश्यक सुविधा असलेल्या रुग्णालयांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य (एमपीकेए) योजना या नावाने सुरू केलेल्या या योजनेची अंमलबजावणी २००६ पासून करण्यात आली. सुरुवातीला त्याचा लाभ केवळ सेवेत कार्यरत असलेल्यांसाठी होता. कालांतराने त्यात बदल करून दहशतवादी हल्ल्यात किंवा नक्षलग्रस्त जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढत असताना शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही संबंधितांच्या निवृत्तीच्या दिवसापर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. मुंबईत मध्यवर्ती पोलीस कल्याण निधी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेविषयीची मागणी नागपूर लोहमार्ग आयुक्तांकडून करण्यात आली होती. त्यात ड्युटीवर असताना आजारपणामुळे किंवा नैसर्गिक मृत्यू पावलेल्यांना सरसकट ही योजना लागू करणे योग्य नाही. त्या ऐवजी दरोडेखोर, संघटित गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईवेळी या मोहिमेतील अधिकारी, कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही सेवा लागू करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव बनविण्याचे महासंचालक दयाल यांनी जाहीर केले.