शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार

By admin | Updated: August 6, 2015 01:57 IST

दरोडेखोर, संघटित गुंडांशी लढताना पोलिसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या मोफत कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे

जमीर काझी ल्ल मुंबईदरोडेखोर, संघटित गुंडांशी लढताना पोलिसाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांच्या मोफत कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. संबंधितांच्या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत त्यांच्या पात्र वारसांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येणार आहे.या संदर्भातील प्रस्ताव लवकरच राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ९ वर्षांपासून विविध आजारांवर नामांकित हॉस्पिटलांमध्ये पूर्णपणे मोफत (कॅशलेस) उपचाराची सुविधा आहे. मात्र संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी हयात असेपर्यंतच ही सुविधा होती. पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या पोलीस कल्याण निधी समिती बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला गृह विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पुढाकारामुळे १९ मार्च २००५ साली राज्य सरकारने पोलिसांसह कुटुंबीयांना पूर्णपणे मोफत उपचार व औषधोपचार पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी साध्या व गंभीर स्वरूपाच्या ३० आजारांची निश्चिती करून प्रत्येक जिल्ह्यातील विविध विकारांबाबतच्या तज्ज्ञ व आवश्यक सुविधा असलेल्या रुग्णालयांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य (एमपीकेए) योजना या नावाने सुरू केलेल्या या योजनेची अंमलबजावणी २००६ पासून करण्यात आली. सुरुवातीला त्याचा लाभ केवळ सेवेत कार्यरत असलेल्यांसाठी होता. कालांतराने त्यात बदल करून दहशतवादी हल्ल्यात किंवा नक्षलग्रस्त जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढत असताना शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही संबंधितांच्या निवृत्तीच्या दिवसापर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. मुंबईत मध्यवर्ती पोलीस कल्याण निधी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेविषयीची मागणी नागपूर लोहमार्ग आयुक्तांकडून करण्यात आली होती. त्यात ड्युटीवर असताना आजारपणामुळे किंवा नैसर्गिक मृत्यू पावलेल्यांना सरसकट ही योजना लागू करणे योग्य नाही. त्या ऐवजी दरोडेखोर, संघटित गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईवेळी या मोहिमेतील अधिकारी, कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही सेवा लागू करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव बनविण्याचे महासंचालक दयाल यांनी जाहीर केले.