शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
5
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
6
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
7
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
8
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
9
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
10
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
11
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
12
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
13
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
14
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
15
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
16
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
17
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
18
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
19
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
20
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट

भाजीपाल्याची एसटीतून विनाशुल्क वाहतूक

By admin | Updated: November 15, 2016 06:32 IST

५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे.

मुंबई : ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे. यात शेतकरीही होरपळले असून बाजार समित्यांमध्ये स्विकारण्यात येत नसलेल्या नोटा, सुट्या पैशांची चणचण यामुळे शेतकऱ्यांचीही पंचाईत झाली आहे. शेतकऱ्यांची यामधून सुटका व्हावी आणि भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी ५0 किलोपर्यंतचा भाजीपाला एसटीतून विनाशुल्क नेण्यास एसटी महामंडळाने मंजुरी दिली आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत हा निर्णय लागू राहिल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. एसटीतून जास्तीत जास्त प्रत्येक प्रवाशामागे ५0 किलोपर्यंतचा माल वाहून नेला जाऊ शकतो. सध्या ५0 किलोपर्यंतचा माल ५0 किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी प्रत्येक प्रवाशामागे ६ रुपये आकारण्यात येतात. हा माल नेताना सुट्या पैशांवरुनही वाहक आणि चालकांमध्ये वाद होताना दिसतात. या सर्व कटकटीतून सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने ५0 किलोपर्यंतचा कृषीमाल अथवा भाजीपाला वाहून नेण्यासाठी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २४ नोव्हेंबरपर्यंत लागू असेल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. याबाबतचे आदेशच परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते तसेच व्यवस्थापकीय संचालक रणजिंतसिंह देओल यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. ५00 आणि १000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरच्या रात्री घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर चांगलाच परिणाम होऊ लागला. अनेकांकडे नव्या नोटा असल्या तरी सुटे पैसेच नसल्याने दैनदिन खर्च करायचा कसा असा सवाल उपस्थित झाला. त्यामुळे एसटीतून लांबचा तसेच स्थानिक प्रवास करणेही अनेकांनी टाळले. त्याचा परिणाम ऐन दिवाळीत एसटीच्या भारमानावर झाला आणि १0 नोव्हेंबरपासून भारमान घसरल्याने एसटीला मोठा तोटा होऊ लागला.