शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

कॅन्सरमुक्तीनंतर मोफत सेवा!

By admin | Updated: January 9, 2017 04:36 IST

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर योग्य उपचार व इच्छाशक्तीच्या जोरावर राजमोहम्मद खान ईस्माईलखान शिकलगर

खुदाबक्ष शेखे /  भामेर (धुळे)कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर योग्य उपचार व इच्छाशक्तीच्या जोरावर राजमोहम्मद खान ईस्माईलखान शिकलगर (रा. चोपडा, जि. जळगाव) यांनी यशस्वीपणे मात करत उर्वरित आयुष्य कॅन्सर रुग्णांसाठी समर्पित केले आहे. राजमोहम्मद हे कॅन्सर रुग्णांना नाशिक, मुंबईपर्यंत स्वत: दवाखान्यात पोहचविण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. आजतागायत त्यांनी १५८ रुग्णांना मोफत सेवा दिली आहे. पेंटिंगचे काम करणाऱ्या राजमोहम्मद खान शिकलगर (४०) यांना गुटखा व तंबाखूचे व्यसन लागले. २००९ मध्ये त्यांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान धुळे येथील कॅन्सरतज्ज्ञ व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. त्यामुळे कुटुंबातील सर्व जण हादरले. डॉक्टरांनी शिकलगर यांच्यावर शस्त्रक्रिया केली. पुढील उपचारासाठी मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये पाठवले. तेथे १५ दिवस राजमोहम्मद यांच्यावर उपचार सुरू होते.जीवघेण्या आजारातून जर वाचलो तर पुढील आयुष्य कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी अर्पण करीन. इतरांच्या आयुष्याचे नुकसान होऊ देणार नाही, असे ठरवून त्यांनी कॅन्सरग्रस्तांना मार्गदर्शनाची सुरुवात केली. त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी शाहीन ईरम यांनी साथ दिली. महिन्यातील १० ते १२ दिवस ते कॅन्सरग्रस्तांसाठी देतात. राजमोहम्मद हे आता आजारातून आता पूर्णपणे बरे झाले आहे. त्यांनी कॅन्सर रुग्ण हेल्प सेंटर व मानवता बहुउद्देशीय संस्था स्थापन केली आहे. समाजातील गरीब व गरजू रुग्णांना ते स्वत: नाशिकच्या क्युरी मानवता कॅन्सर सेंटर वा मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथे घेऊन जातात. केस पेपर काढण्यापासून ते उपचार सुरू होईपर्यंत सर्व सोपस्कार ते स्वत: करतात.