शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ-जळगाव दरम्यान नवीन रेल्वेगाडयांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 5, 2016 09:25 IST

भुसावळ-जळगाव दरम्यान २५ कि.मी. लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम एकाचवेळी होणार असल्याने नवीन गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंढरीनाथ गवळी, ऑनलाइन लोकमत 

भुसावळ, दि. ५ - भुसावळ-जळगाव दरम्यान २५ कि.मी. लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम एकाचवेळी होणार असल्याने नवीन गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ-जळगाव या २५ कि.मी. लांबीच्या चौथ्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता या मार्गाच्या उभारणीलाही रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे.

२६१.६७ कोटींचे अंदाजपत्रकभुसावळ-जळगाव या २५ कि.मी.चा चौथा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी अंदाजे २६१.३७ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतचे अंदाजपत्रक मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाला सादर करण्यात आले आहे.

तिसरा आणि चौथा या दोन्ही मार्गांची सोबतच उभारणी केली जाणार आहे. मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मार्गासाठी अत्यंत आवश्यक अशी चार कि.मी. इतकी जमीन भू-संपादनाची प्रक्रिया बाकी आहे. ही जमीन तरसोद, नशिराबाद व असोदा या तीन गावांच्या शिवारातील आहे. जमीन संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. २०१३ च्या नवीन कायद्यानुसार भू-संपादन प्रक्रिया राबविली जात आहे. मनमाड-इंदूर सर्वेक्षणासाठी निविदा ४मनमाड-इंदूर या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी महिनाभरात निविदा प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी सर्वेक्षण पूर्ण होईल. पाचोरा-जामनेर ही रेल्वे बोदवडपर्यंत व पहूर-अजिंठा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.

जळगाव-मनमाड तिसऱ्या मार्गासाठी अहवाल४यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या जळगाव-मनमाड या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना या महिन्यात सादर करण्यात येणार आहे.

भुसावळ-जळगाव अत्यंत व्यस्त मार्गभुसावळ रेल्वेस्थानक महत्त्वाचे आहे. नागपूर व दिल्लीकडून प्रत्येकी दोन मार्ग भुसावळात येतात. अशाच पद्धतीने जळगाव येथून मुंबई व सुरतकडे दोन मार्ग जातात.भुसावळ-जळगाव दरम्यान दोनच मार्ग आहेत. त्यामुळे हा मार्ग अत्यंत व्यस्त असून कोणतीही नवीन रेल्वे सुरू करणे कठीण आहे.२५ कोटींची बचत...रेल्वेच्या बांधकाम विभागाने तिसरा रेल्वे मार्ग उभारणीचे नियोजन केले आहे.त्यासाठी जळगाव-भुसावळ दरम्यान भादलीजवळ वळण तयार करून मातीचा भराव टाकून पुलाची उभारणी केली. त्यामुळे खालून व वरून रेल्वेमार्ग राहणार आहे.तसा पूलही आकारास येत आहे.या नवीन तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वेचा २५ कोटी रुपयांचा निधी वाचला. डीआरएम सुधीरकुमार गुप्ता आणि सहकाऱ्यांनी यासंबंधी नियोजन केले.