शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

महामार्ग रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 3, 2016 05:18 IST

आळेफाटा येथील बायपासच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथील बायपासच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-नाशिक अंतर केवळ तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.पुणे-नाशिक महामार्गाच्या चार पदरीकरणाचा विषय विविध कारणांमुळे रेंगाळत आहे. पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर ते आळेफाटा असा ५५ किलोमिटरचा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे. यासाठी २५३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भविष्यात वाढणारी वाहतूक विचारात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथे बायपास प्रस्तावित केले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील एक हजार पेक्षा अधिक शेतकरी बांधित होत आहेत. जमिनीला आलेले प्रचंड भाव व मोठ्या प्रमाणात सुपिक जमिनी संपादनात जात असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. यासाठी या पाच गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बायपासच्या विरोधात याचिक दाखल केली. शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी न्यायालयाने बायपास करण्यासाठी स्थगिती दिली होती. शेतकऱ्यांनी याचिका दाखल करताना बायपासची गरज नसताना बायपास करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात सुपिक व बागायत जमिन संपादित होत असून, अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. काही धनदांडग्या लोकांच्या जमिनी वाचविण्यासाठी बायपास प्रस्तावित केल्याचा आरोप केला होता. (प्रतिनिधी)>अपिलसाठी स्थगिती...शेतकरी आणि भूसंपादन अधिकारी, एनएचएआय याची बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिक फेटाळली. अपिल करण्यासाठी स्थगिती देता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी बायपासला स्थगिती