शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

हे तर फसवणूक करणारे सरकार !

By admin | Updated: October 30, 2015 01:22 IST

राज्यातील फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली

मुंबई : राज्यातील फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या १० महिन्यांतच या सरकारने राज्यावर ५४ हजार कोटींचे कर्ज लादले. वृत्तपत्रांच्या मथळ्यात राहण्यात धन्यता मानत असलेले हे सरकार, जनतेच्या मनातून सपशेल उतरले आहे, असेही मुंडे म्हणाले.शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील युती सरकारच्या वर्षभरातील कारभारावर टीका केली. सरकारने ३ हजार ७०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. पावसाळी अधिवेशनात १४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. दुष्काळाच्या नावावर पेट्रोल, डिझेलची करवाढ करून १६०० कोटींची अधिकची करवसुली लादली. नदी नियमन धोरण लोकाभिमुख करण्याचे आश्वासन ठरावीक उद्योजकांच्या फायद्यासाठी पहिल्या वर्षीच रद्द केले. रद्द केलेले धोरण पुन्हा लागू करण्याची नामुष्की राष्ट्रीय हरीत लवादाच्या २७ आॅक्टोबरच्या निर्णयामुळे सरकारवर आली, असे मुंडे म्हणाले.सरकारने राज्य कृषिमूल्य आयोगाची नऊ महिन्यांपूर्वी स्थापना केली, परंतु या नऊ महिन्यांत आयोगावर सदस्य नेमले नाहीत की, आयोगाची एकही बैठक झाली नाही. जे सरकार आयोगाचे सदस्य नेमू शकत नाही, ते कृषिमालाला रास्त भाव काय देणार, असा सवालही मुंडे यांनी केला. ‘अच्छे दिन’च येणार सांगून सत्ता मिळवलेल्या सरकारने जनतेला ‘बुरे दिन’ दाखवले आहेत. ‘अब की बार.. भाजप सरकार..’ ही घोषणा ‘अब की बार... डान्स बार’ मध्ये बदलल्याचेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)