शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

चौघांना आजन्म कारावास

By admin | Updated: May 6, 2016 05:26 IST

देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने

- किनन-रुबेन हत्याप्रकरण

मुंबई : देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तब्बल पाच वर्षे हा खटला चालला.जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल अशी या आरोपींची नावे आहेत. विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी या चारही जणांना छेडछाड, कट आणि हत्या या आरोपांतर्गत दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह २८ साक्षीदारांची साक्ष न्यायालयापुढेनोंदवली. ‘सरकारने आरोपींसाठी फाशीची शिक्षा मागितलीच नव्हती. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी, अशीच मागणी सरकारने केली होती. न्यायालयाने आमचे म्हणणे मान्य केले,’ असे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.पाच वर्षांपूर्वी, २० आॅक्टोबर २०११ मध्ये किनन (२४) आणि रुबेन (२९) अंधेरीतील आंबोली परिसरातील एका रेस्टॉरंटमधून त्यांच्या दोन मैत्रिणींसह बाहेर पडले. त्यावेळी काही टपोरींनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. आपल्या मैत्रिणींची छेड काढण्यात येत आहे, हे बघून किनान व रुबेन वैतागले. त्यांनी त्या तरुणांना रोखले. बाचाबाची झाल्यावर ते तरुण निघून गेले. मात्र पुन्हा थोड्यावेळाने आणखी काही मित्र व चॉपर घेऊन परत आले. एकूण चार जणांनी किनान-रुबेनला मारहाण करून त्यांच्यावर चॉपरवर हल्ला केला. किनानचा मृत्यू त्याच रात्री झाला. तर रुबेनचा मृत्यू ३१ आॅक्टोबर रोजी झाला. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चारही आरोपींना ताब्यात घेतले. या चारही आरोपींचा माजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याशी संबंध असल्याचेही पुढे पोलीस तपासात उघडकीस आले.या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली. मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याशिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. (प्रतिनिधी)लढाई संपली नाही, ही तर सुरुवात न्यायालयाच्या निर्णयावर मी समाधानी आहे. हा गुन्हा दुर्मिळ नसल्याने आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केलीच नव्हती. या चारही जणांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी, अशीच आमची इच्छा होती. त्यानुसार या चौघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र आताशी ही सुरुवात आहे. अजून लढाई लढायची आहे. कारण हे आरोपी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जातील. त्यामुळे आणखी वाट पहावी लागेल. मात्र समाजात योग्य तो संदेश गेला आहे.- वालरिन संतोस, किनानचे वडील