शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

चौघांना आजन्म कारावास

By admin | Updated: May 6, 2016 05:26 IST

देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने

- किनन-रुबेन हत्याप्रकरण

मुंबई : देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तब्बल पाच वर्षे हा खटला चालला.जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल अशी या आरोपींची नावे आहेत. विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी या चारही जणांना छेडछाड, कट आणि हत्या या आरोपांतर्गत दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह २८ साक्षीदारांची साक्ष न्यायालयापुढेनोंदवली. ‘सरकारने आरोपींसाठी फाशीची शिक्षा मागितलीच नव्हती. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी, अशीच मागणी सरकारने केली होती. न्यायालयाने आमचे म्हणणे मान्य केले,’ असे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.पाच वर्षांपूर्वी, २० आॅक्टोबर २०११ मध्ये किनन (२४) आणि रुबेन (२९) अंधेरीतील आंबोली परिसरातील एका रेस्टॉरंटमधून त्यांच्या दोन मैत्रिणींसह बाहेर पडले. त्यावेळी काही टपोरींनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. आपल्या मैत्रिणींची छेड काढण्यात येत आहे, हे बघून किनान व रुबेन वैतागले. त्यांनी त्या तरुणांना रोखले. बाचाबाची झाल्यावर ते तरुण निघून गेले. मात्र पुन्हा थोड्यावेळाने आणखी काही मित्र व चॉपर घेऊन परत आले. एकूण चार जणांनी किनान-रुबेनला मारहाण करून त्यांच्यावर चॉपरवर हल्ला केला. किनानचा मृत्यू त्याच रात्री झाला. तर रुबेनचा मृत्यू ३१ आॅक्टोबर रोजी झाला. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चारही आरोपींना ताब्यात घेतले. या चारही आरोपींचा माजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याशी संबंध असल्याचेही पुढे पोलीस तपासात उघडकीस आले.या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली. मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याशिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. (प्रतिनिधी)लढाई संपली नाही, ही तर सुरुवात न्यायालयाच्या निर्णयावर मी समाधानी आहे. हा गुन्हा दुर्मिळ नसल्याने आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केलीच नव्हती. या चारही जणांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी, अशीच आमची इच्छा होती. त्यानुसार या चौघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र आताशी ही सुरुवात आहे. अजून लढाई लढायची आहे. कारण हे आरोपी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जातील. त्यामुळे आणखी वाट पहावी लागेल. मात्र समाजात योग्य तो संदेश गेला आहे.- वालरिन संतोस, किनानचे वडील