शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

चौदा प्रकल्पांच्या निविदा रद्द

By admin | Updated: August 31, 2016 06:09 IST

आघाडी सरकारच्या काळातील चौदा सिंचन प्रकल्पांच्या ३ हजार ३०४ कोटी रुपयांच्या एकूण ९४ निविदा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

मुंबई : आघाडी सरकारच्या काळातील चौदा सिंचन प्रकल्पांच्या ३ हजार ३०४ कोटी रुपयांच्या एकूण ९४ निविदा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. ज्यात विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द, नाशिक जिल्ह्यातील किकवी आणि कोकणातील १२ सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांत प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी सुरू असून ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या समितीनेही त्यावर अनेक आक्षेप नोंदविले आहेत. या सिंचन प्रकल्पांत निविदा मंजूर करण्यापासून परवानग्या न घेता केलेली कामे आणि बांधकामामध्ये अनियमितता आढळून आली आहे. एन.डी. वडनेरे समितीने गोसीखुर्द प्रकल्पाच्या निविदा निश्चितीकरणातील काही अनियमितता निदर्शनास आणल्या होत्या. कोकणातील १२ प्रकल्पांमधील बहुतांशी प्रकरणी भूसंपादन, पुनर्वसन, वनजमीन हस्तांतरण झालेलेच नव्हते. त्यामुळे आता सर्व निविदा नव्याने काढण्यात येणार असून या प्रकल्पांची कामे २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. ज्या निविदांमधील एक कोटी रुपये वा त्यापेक्षा कमी किमतीची कामेच पूर्ण व्हावयाची आहेत ती रद्द केली जाणार नाहीत, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.निविदा रद्द करून त्या नव्याने काढण्यात येणार असल्या तरी आधीच्या कामांची एसीबी चौकशी सुरूच राहील आणि त्या अनुषंगाने संबंधितांवर कारवाईदेखील केली जाईल. सध्या बहुतेक कंत्राटदारांनी कामे थांबविली होती. अधिकारी कामे पुढे नेण्यास इच्छुक नव्हते. अशा वेळी प्रकल्पांची कामे अर्धवट ठेवणे योग्य नव्हते हेही नवीन निविदा काढण्याचे एक प्रमुख कारण असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. कोकणातील १२ प्रकल्प : कोकणातील ज्या प्रकल्पांच्या १५१५ कोटी रु.च्या निविदा रद्द केल्या ते प्रकल्प असे : बाळगंगा, काळू, शिरशिंगे, गडगडी, शीळ, शाई, सुसरी, गडनदी, कोंडाणे, चणेरा, जामदा आणि काळ या १२ प्रकल्पांचा समावेश आहे. ही सर्व कामे एफ.ए.कन्स्ट्रक्शन कंपनीकडे होती.