शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

चार हजार रु ग्णांसाठी ‘जीवनदायी’ ठरली आधार

By admin | Updated: November 28, 2014 01:03 IST

गोरगरिब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत वर्षभरात नागपुरातील ४ हजार १५४ रुग्णांना उपचार मिळाला आहे. यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही योजना खरी

मेडिकलमध्ये सर्वात जास्त रुग्णांची नोंदनागपूर : गोरगरिब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत वर्षभरात नागपुरातील ४ हजार १५४ रुग्णांना उपचार मिळाला आहे. यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही योजना खरी जीवनदायी ठरली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा दुसरा टप्पा २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात सुरू झाला. नागपूर जिल्ह्यात ही योजना तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. या योजनेत ९७२ आजारांवर उपचारासाठी सुरक्षेचे कवच दिले. मागील वर्षभरात एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या योजनेच्या केंद्रावरून ४ हजार १५४ जणांन उपचार घेतले. या रु ग्णांवर उपचाराच्या मोबदल्यात विमा कंपनीने आतापर्यंत ३ कोटी ३५ लाख रु पये दिले आहेत. याशिवाय अद्याप ५४ लाख रु पयांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बिलांमध्ये १०२ रु ग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, १३ लाख रुपयांची बिले विमा कंपनीने अगदीच क्षुल्लक कारणे देऊन प्रलंबित ठेवली आहे. या उपचाराचा फटका मेडिकलला बसला आहे. विमा कंपनी विविध कारणे देऊन बिले ना मंजूर करीत असल्याने याचा फटका आता रुग्णांनाही बसत आहे. ३ हजार ८२६ कर्करोगाच्या रुग्णांना लाभया योजनेत ३ हजार ८२६ कर्करोग रुग्णांनी मागील वर्षी उपचार घेतला. रेडिएशनच्या ३४९, अस्थिरोगाच्या१४६ , ट्रमाच्या ३३० यासह इतरही आजाराच्या रुग्णांनीही लाभ घेतला. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात १ हजार २४४ रुग्णांवर तर मेयोमध्ये ६१० रुग्णांवर उपचार करण्यात आले. वर्षभरात या तिन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये ५ हजार ४६९ रुग्णांवर उपचार झाले. (प्रतिनिधी)