शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत..-अवयवदान चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:14 IST

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत ...

ठळक मुद्देअलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.

अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत विविध सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत; पण मृत्यूनंतर शरीराची चिरफाड करण्यास नातेवाईक तयार नसल्याने अजूनही अनेकांची अवयवदानाची मानसिकता दिसत नाही. तरीही अलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले आहेत.

अलीकडे बदललेली जीवनशैली, धकाधकीचे जीवन, अतिव्यसन व अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात होणाºया रासायनिक माºयामुळे माणसाचे अवयव लवकर निकामी होऊ लागले आहेत. मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया अतिशय खर्चाची आहे. या दोन्ही शस्त्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालतात व शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला १० ते १२ दिवस रुग्णालयातच रहावे लागते. या प्रकारे या शस्त्रक्रियेस व त्यानंतरच्या सुश्रुषेस बराच खर्च येतो म्हणून जरी मूत्रपिंड व यकृत दान मिळाले तरी संपूर्ण शस्त्रक्रिया व नंतरची महागडी औषधे यामुळे ती रुग्णावर मोफत करणे अशक्य असते. अशा स्वरुपाच्या शस्त्रक्रिया होण्यासाठी दात्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते. अशा दात्याच्या व संबधित रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या करावे आवश्यक असते.कायदा काय सांगतो...मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रियेत जिवंत व्यक्तीच्या दोनपैकी एकाच मूत्रपिंडाचे आरोपण मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णाच्या शरीरात करता येते. यासंबंधीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १९९४ ला भारत सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अस्तित्वात आणून केवळ स्वत:च्या नातेवाइकांनी म्हणजे आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, आजी-आजोबा यांनाच मूत्रपिंड (किडनी) किंवा यकृताचा (लिव्हर) काही भाग दान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे या दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपणामध्ये मर्यादा आल्या आहेत.या व्यक्तींंचे अवयवदान उपयुक्तमृत रुग्णांची मूत्रपिंडे, यकृत, प्लीहा, स्वादूपिंड, आतडी हृदय, फुप्फुसे व त्वचा अशा अवयवांचे आरोपण होऊ शकते. रुग्ण ब्रेनडेड घोषित झाल्यावर २४ ते ४८ तासांतच हे अवयव शस्त्रक्रियेद्वारे रुग्णांच्या शरीरातून काढून घ्यावे लागतात. मेंदूस्तंभ मृत्यू (ब्रेन डेथ), सामान्य मृत्यू (नॉर्मल डेथ) व जिवंत व्यक्ति (लाईव्ह डोनर) या व्यक्ती अवयवदान करू शकतात.मेंदूमृत्यूमुळे अवयव प्रत्यारोपण  वर्ष किडनी लिव्हर फुप्फुसे हृदय इतर अवयव एकूण२०१५ ९७ ४१ ० ५ १३ १५६२०१६ २०४ ११७ १ ३५ ३७ ३९३जुलै २०१७ ७७ ४३ १ २३ ९ १५३एकूण ३७८ २०१ २ ६३ ५९ ७०२