शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत..-अवयवदान चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:14 IST

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत ...

ठळक मुद्देअलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.

अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत विविध सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत; पण मृत्यूनंतर शरीराची चिरफाड करण्यास नातेवाईक तयार नसल्याने अजूनही अनेकांची अवयवदानाची मानसिकता दिसत नाही. तरीही अलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले आहेत.

अलीकडे बदललेली जीवनशैली, धकाधकीचे जीवन, अतिव्यसन व अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात होणाºया रासायनिक माºयामुळे माणसाचे अवयव लवकर निकामी होऊ लागले आहेत. मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया अतिशय खर्चाची आहे. या दोन्ही शस्त्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालतात व शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला १० ते १२ दिवस रुग्णालयातच रहावे लागते. या प्रकारे या शस्त्रक्रियेस व त्यानंतरच्या सुश्रुषेस बराच खर्च येतो म्हणून जरी मूत्रपिंड व यकृत दान मिळाले तरी संपूर्ण शस्त्रक्रिया व नंतरची महागडी औषधे यामुळे ती रुग्णावर मोफत करणे अशक्य असते. अशा स्वरुपाच्या शस्त्रक्रिया होण्यासाठी दात्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते. अशा दात्याच्या व संबधित रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या करावे आवश्यक असते.कायदा काय सांगतो...मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रियेत जिवंत व्यक्तीच्या दोनपैकी एकाच मूत्रपिंडाचे आरोपण मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णाच्या शरीरात करता येते. यासंबंधीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १९९४ ला भारत सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अस्तित्वात आणून केवळ स्वत:च्या नातेवाइकांनी म्हणजे आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, आजी-आजोबा यांनाच मूत्रपिंड (किडनी) किंवा यकृताचा (लिव्हर) काही भाग दान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे या दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपणामध्ये मर्यादा आल्या आहेत.या व्यक्तींंचे अवयवदान उपयुक्तमृत रुग्णांची मूत्रपिंडे, यकृत, प्लीहा, स्वादूपिंड, आतडी हृदय, फुप्फुसे व त्वचा अशा अवयवांचे आरोपण होऊ शकते. रुग्ण ब्रेनडेड घोषित झाल्यावर २४ ते ४८ तासांतच हे अवयव शस्त्रक्रियेद्वारे रुग्णांच्या शरीरातून काढून घ्यावे लागतात. मेंदूस्तंभ मृत्यू (ब्रेन डेथ), सामान्य मृत्यू (नॉर्मल डेथ) व जिवंत व्यक्ति (लाईव्ह डोनर) या व्यक्ती अवयवदान करू शकतात.मेंदूमृत्यूमुळे अवयव प्रत्यारोपण  वर्ष किडनी लिव्हर फुप्फुसे हृदय इतर अवयव एकूण२०१५ ९७ ४१ ० ५ १३ १५६२०१६ २०४ ११७ १ ३५ ३७ ३९३जुलै २०१७ ७७ ४३ १ २३ ९ १५३एकूण ३७८ २०१ २ ६३ ५९ ७०२