शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत..-अवयवदान चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:14 IST

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत ...

ठळक मुद्देअलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात अवयवदान चळवळीला कृतिशील पाठबळ मिळत असून गेल्या तीन वर्षांत तब्बल ७०२ विविध अवयवांचे प्रत्यारोपण झाले आहे. लोकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक अपंगत्व अथवा अपघाताने अवयव गमावलेल्यांच्या जीवनात प्रकाश पडला आहे मात्र अजून चार हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत.

अवयवदान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याबाबत विविध सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत; पण मृत्यूनंतर शरीराची चिरफाड करण्यास नातेवाईक तयार नसल्याने अजूनही अनेकांची अवयवदानाची मानसिकता दिसत नाही. तरीही अलीकडे खेडोपाडी विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांमुळे लोक अवयवदानाकडे वळू लागले आहेत.

अलीकडे बदललेली जीवनशैली, धकाधकीचे जीवन, अतिव्यसन व अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीरात होणाºया रासायनिक माºयामुळे माणसाचे अवयव लवकर निकामी होऊ लागले आहेत. मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया अतिशय खर्चाची आहे. या दोन्ही शस्त्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालतात व शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला १० ते १२ दिवस रुग्णालयातच रहावे लागते. या प्रकारे या शस्त्रक्रियेस व त्यानंतरच्या सुश्रुषेस बराच खर्च येतो म्हणून जरी मूत्रपिंड व यकृत दान मिळाले तरी संपूर्ण शस्त्रक्रिया व नंतरची महागडी औषधे यामुळे ती रुग्णावर मोफत करणे अशक्य असते. अशा स्वरुपाच्या शस्त्रक्रिया होण्यासाठी दात्या व्यक्तिच्या जवळच्या नातेवाईकांची संमती संपर्क ठेऊन त्यांना या दानाचे महत्व पटवून द्यावे लागते. अशा दात्याच्या व संबधित रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या करावे आवश्यक असते.कायदा काय सांगतो...मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रियेत जिवंत व्यक्तीच्या दोनपैकी एकाच मूत्रपिंडाचे आरोपण मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णाच्या शरीरात करता येते. यासंबंधीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १९९४ ला भारत सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अस्तित्वात आणून केवळ स्वत:च्या नातेवाइकांनी म्हणजे आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, आजी-आजोबा यांनाच मूत्रपिंड (किडनी) किंवा यकृताचा (लिव्हर) काही भाग दान करण्यास परवानगी दिली. त्यामुळे या दोन्ही अवयवांच्या प्रत्यारोपणामध्ये मर्यादा आल्या आहेत.या व्यक्तींंचे अवयवदान उपयुक्तमृत रुग्णांची मूत्रपिंडे, यकृत, प्लीहा, स्वादूपिंड, आतडी हृदय, फुप्फुसे व त्वचा अशा अवयवांचे आरोपण होऊ शकते. रुग्ण ब्रेनडेड घोषित झाल्यावर २४ ते ४८ तासांतच हे अवयव शस्त्रक्रियेद्वारे रुग्णांच्या शरीरातून काढून घ्यावे लागतात. मेंदूस्तंभ मृत्यू (ब्रेन डेथ), सामान्य मृत्यू (नॉर्मल डेथ) व जिवंत व्यक्ति (लाईव्ह डोनर) या व्यक्ती अवयवदान करू शकतात.मेंदूमृत्यूमुळे अवयव प्रत्यारोपण  वर्ष किडनी लिव्हर फुप्फुसे हृदय इतर अवयव एकूण२०१५ ९७ ४१ ० ५ १३ १५६२०१६ २०४ ११७ १ ३५ ३७ ३९३जुलै २०१७ ७७ ४३ १ २३ ९ १५३एकूण ३७८ २०१ २ ६३ ५९ ७०२