शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

माळशेज घाटात चार बिबटे ?

By admin | Updated: February 11, 2017 03:53 IST

सह्याद्री पर्वताची रांग असलेल्या माळशेज घाटाच्या जंगलपट्ट्यात कमीतकमी चार बिबट्यांचा मुक्त संचार आहे. ते त्यांच्या मस्तीत शिकारीसाठी जंगलात वावरत आहेत.

सुरेश लोखंडे, ठाणेसह्याद्री पर्वताची रांग असलेल्या माळशेज घाटाच्या जंगलपट्ट्यात कमीतकमी चार बिबट्यांचा मुक्त संचार आहे. ते त्यांच्या मस्तीत शिकारीसाठी जंगलात वावरत आहेत. याची जाणीव ठेवून माळशेज घाटात फिरायला किंवा वीकेण्डला येणाऱ्या मुंबई, ठाणे परिसरांतील पर्यटक, तर मुरबाड तालुक्यातील शेतकरी, मेंढपाळ आणि गुराख्यांना या बिबट्यांपासून सावध राहण्याचा इशारा वन खात्याने दिला आहे. दुसरीकडे स्थानिकांनी रेस्क्यू सेंटरची मागणी केली आहे.या बिबट्यांनी शेळ्या, गायी, वासरे आदींवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला आहे. हल्ल्याच्या सुमारे १० घटना माळशेज घाट परिसरातील मुरबाड तालुक्याच्या गावपाड्यांत नुकत्याच घडल्या आहेत. या हल्ल्यांचा पंचनामा करून आठ ते दहा शेतकरी, मेंढपाळांना नुकसानभरपाई दिल्याचा दावा उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांनी लोकमतकडे केला. या जंगलपट्ट्यात वावरणारे बिबटे कोठूनही आणलेले नाही. एवढेच नव्हे, तर जुन्नर किंवा पनवेल परिसरांतील अभयारण्यातून ते चुकून माळशेजच्या जंगलात आलेले नाहीत. ते मूळचे माळशेज पट्ट्यातील आहेत. वाघाचीवाडी हा पाडा त्यासाठी प्रसिद्ध आहे. या वाडीच्या परिसरातील जंगलात बिबटे वास्तव्याला आहेत. २५ ते ३० किलोमीटरच्या अंतरावर ते एकमेकांपासून दूर वास्तव्याला आहेत. सध्या तरी कमीतकमी चार बिबट्यांचे वास्तव्य आढळल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कल्याण-नगर या राष्ट्रीय महामार्गावरील टोकावडे गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील साखरवाडी, मोरोशी, सोनावळे, सिंगापूर, शिरोशी, माळ, सावरणे, हेदवली, खापरी, फांगणे, फांगुळ, गव्हाण, मानिवली, पळू या आदिवासी गावपाड्यांच्या जंगलपट्ट्यात या बिबट्यांचा वावर आहे. ग्रामस्थांनी रात्री उघड्यावर शौचास बसू नये, जंगलात जाताना हातकाठी असावी. शिवाय, एकट्यादुकट्याने जंगलात जाऊ नये. अंधार होण्याआधी घरी परतावे. रात्री घरातून बाहेर पडू नये. रात्रीच्या वेळी हातात बॅटरी व काठी असावी. गावात रात्रभर लाइट असावी इत्यादी मार्गदर्शक सूचना गावकऱ्यांना वन विभागाकडून दिल्या जात आहेत.