शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद

By admin | Updated: July 7, 2015 02:12 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे सोमवारी एकच संच चालू होता. यातून केवळ १९३ मेगावॅट वीजनिर्मीती झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

परळी : पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे सोमवारी एकच संच चालू होता. यातून केवळ १९३ मेगावॅट वीजनिर्मीती झाल्याचे सूत्रांनी सांगितले.या विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या खडका (जि. परभणी) येथील धरणात पाण्याचा ठणठणाट झाल्याने सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ५ हा बंद ठेवण्यात आला. २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ४ हा रविवारी सायंकाळी बंद करण्यात आला. तसेच २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ६ व २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ३ हे दोन संच पाण्याअभावी यापूर्वीच बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवारी नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ७ हा एकमेव चालू होता, त्यातून सायंकाळी ५.३० च्या सुमारास १९३ मेगावॅट विजेचे उत्पादन चालू होते. परळी औष्णिक विद्युत केंद्रात ५ संच आहेत. या संचाची स्थापित क्षमता ११३० मेगावॅट आहे. पाण्याच्या समस्येमुळे ४ संच बंद ठेवावे लागल्याने ९३७ मेगावॅट एवढी तूट सोमवारी सायंकाळी निर्माण झाली. चालू असलेला एक संचही पाणीटंचाईमुळे बंद पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आर.बी. गोहणे म्हणाले की, सोमवारी दुपारी २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ५ पाणी नसल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. संच क्र. ४ हा रविवारी बंद करण्यात आला व संच क्र. ६ हा ११ दिवसापुर्वी बंद करण्यात आला. यापुर्वी संच क्र. ३ बंद केलेला आहे. खडका धरणात पाणीसाठा नसल्यामुळे हे संच बंद ठेवावे लागले. सोमवारी एक संच चालू होता, यातून विज निर्मिती उत्पादीत होत होती. (वार्ताहर)नागापूर धरणातून पाणी घ्यावे लागणारदोन वर्षांपूर्वीही परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्वच संच काही दिवस पाण्याअभावी बंद ठेवावे लागले होते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शक्तिकुंज वसाहतीतील १६०० कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांनाही नागापूर धरणातून पाणी पुरवठा करावा लागला होता. पुन्हा आता तीच वेळ आली आहे.