शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद

By admin | Updated: July 7, 2015 02:12 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे सोमवारी एकच संच चालू होता. यातून केवळ १९३ मेगावॅट वीजनिर्मीती झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

परळी : पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे सोमवारी एकच संच चालू होता. यातून केवळ १९३ मेगावॅट वीजनिर्मीती झाल्याचे सूत्रांनी सांगितले.या विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या खडका (जि. परभणी) येथील धरणात पाण्याचा ठणठणाट झाल्याने सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ५ हा बंद ठेवण्यात आला. २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ४ हा रविवारी सायंकाळी बंद करण्यात आला. तसेच २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ६ व २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ३ हे दोन संच पाण्याअभावी यापूर्वीच बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवारी नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ७ हा एकमेव चालू होता, त्यातून सायंकाळी ५.३० च्या सुमारास १९३ मेगावॅट विजेचे उत्पादन चालू होते. परळी औष्णिक विद्युत केंद्रात ५ संच आहेत. या संचाची स्थापित क्षमता ११३० मेगावॅट आहे. पाण्याच्या समस्येमुळे ४ संच बंद ठेवावे लागल्याने ९३७ मेगावॅट एवढी तूट सोमवारी सायंकाळी निर्माण झाली. चालू असलेला एक संचही पाणीटंचाईमुळे बंद पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आर.बी. गोहणे म्हणाले की, सोमवारी दुपारी २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ५ पाणी नसल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. संच क्र. ४ हा रविवारी बंद करण्यात आला व संच क्र. ६ हा ११ दिवसापुर्वी बंद करण्यात आला. यापुर्वी संच क्र. ३ बंद केलेला आहे. खडका धरणात पाणीसाठा नसल्यामुळे हे संच बंद ठेवावे लागले. सोमवारी एक संच चालू होता, यातून विज निर्मिती उत्पादीत होत होती. (वार्ताहर)नागापूर धरणातून पाणी घ्यावे लागणारदोन वर्षांपूर्वीही परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्वच संच काही दिवस पाण्याअभावी बंद ठेवावे लागले होते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शक्तिकुंज वसाहतीतील १६०० कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांनाही नागापूर धरणातून पाणी पुरवठा करावा लागला होता. पुन्हा आता तीच वेळ आली आहे.