शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

By admin | Updated: October 19, 2016 01:12 IST

उमेदवाराने माघार न घेतल्यामुळे कवी प्रवीण दवणे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. जयप्रकाश घुमटकर अशी चौरंगी लढत होणार

पुणे : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून एकाही उमेदवाराने माघार न घेतल्यामुळे कवी प्रवीण दवणे, समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. जयप्रकाश घुमटकर अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदारांची प्रत्यक्ष भेट, पोस्टाद्वारे आपली भूमिका सांगणारी पत्रे, दूरध्वनीवरून संपर्क याबरोबरच फेसबुक आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडियाचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संमेलनाध्यक्षपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच ज्ञानशाखांनाही साहित्यकृतीचा दर्जा देत त्यांच्यासाठी समीक्षेची दालने खुली करण्याची भूमिका उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र संमेलनाध्यक्ष कोण होणार? यासाठी ११ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. >प्रवीण दवणे : आजकाल भाषेच्याबाबतीत उदासीनतेचे पर्व सुरू झाले आहे. आजकालची मुले भाषाज्ञानाबाबत भांबावलेली दिसतात. पुस्तकांचा खप हा वाचनसंस्कृतीचा पुरावा होऊ शकत नाही. खपलेली पुस्तके कितपत वाचली जातात, हे जाणून घेणे गरजेचे आहे. नवा वाचक निर्माण करायचा असेल तर साहित्यसेवा करण्याची गरज आहे. उमेदीच्या काळात व्यवस्थेत शिरून काम करण्याची गरज आहे. संमेलनाध्यक्षपदाला वेगळा दर्जा आणि वजन असते. त्यामुळे ही संधी घेऊन त्याचे सोने करण्याची माझी इच्छा आहे. सर्वच मतदारांपर्यंत पोहोचू शकेल की नाही, सांगता येत नाही. पण माझे साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे.>डॉ. जयप्रकाश घुमटकर : खेडोपाड्यात विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर त्यांच्यात प्रतिभा असल्याचे जाणवते, मात्र त्यांना व्यासपीठ मिळत नाही. त्यांच्या प्रतिभेला नख लावले जात आहे. त्यांना संधी मिळवून देणे, एक साहित्यिक चळवळ निर्माण करून त्यांच्यातील ऊर्जा तेवत ठेवणे यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आज अनेक सामाजिक विषय आहेत, पण ते अंगावर घेण्याचे धाडस साहित्यिक करीत नाही. मात्र वास्तवादी विषय मांडणारे आणि ज्या साहित्याने समाजाचे प्रबोधन होते असे साहित्य लिहिले गेले पाहिजे. पुण्यापासून धुळे, नाशिक, औरंगाबाद, कर्नाटक, गुलबर्गा आदी विविध भागांतील मतदारांपर्यंत ‘डोअर टू डोअर’ जाऊन भेटणार आहे. >डॉ. अक्षयकुमार काळे : बदलत्या परिस्थितीत मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी अभिरुची, वाचनव्यवहार आणि मराठी संस्कृती यांच्या अस्तित्वाचे आणि संवर्धनाचे प्रश्न जिकिरीचे बनले आहेत. मराठी लेखनव्यवहार, प्रकाशनव्यवहार, मराठी वाचनसंस्कृती यावर सातत्याने पुनर्विचार करून त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांची दिशा ठरविणे आज अपरिहार्य झाले आहे. मराठी समाज, भाषा आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी वचनबद्ध असणाऱ्या वाङ्मय आणि संस्कृती यांचे परस्परसंबंध जाणणाऱ्या क्रियाशील सहृदय रसिकांशी संवाद करून त्यांच्या संवर्धनाच्या योग्य अशा दिशा ठरविता याव्यात, यासाठी मी प्रयत्नशील राहाणार आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी घेता येणे शक्य नाही. मात्र मतदारांना दूरध्वनी करणे, आपली भूमिका सांगणारी पत्रे पाठविणे तसेच फेसबुक आणि यूट्यूबवरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे यावर भर देणार आहे. >डॉ. मदन कुलकर्णी : साहित्याची समीक्षा होणे गरजेचे आहे, मात्र समीक्षात्मक ग्रंथ लिहिण्याचे प्रमाण खूप कमी आहे. अध्ययनात ज्ञानशाखेची आवश्यकता आहे. समाजकारण, अर्थशास्त्र, राजकारण यांसारख्या ज्ञानशाखांचा उपयोग समीक्षेसाठी केला गेला पाहिजे. आज मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण, दलित आणि आदिवासी किती प्रवाहांना आपण स्थान देतो. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. या भूमिकेमधून काम करणार आहे. मतदारांपर्यंत वैयक्तिक गाठीभेटीमधून संपर्क साधणे काहीसे अवघड आहे, मात्र माझे साहित्यातले योगदान आणि अध्यक्षपदाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविणार आहे. काही मतदारांपर्यंत पत्र पोहोचले आहे.