शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चार नद्यांचे पुनरुज्जीवन लवकरच करणार

By admin | Updated: August 25, 2016 05:42 IST

शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल.

नवी मुंबई : शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल. जलयुक्त शिवार प्रकल्पांच्या माध्यमातून राज्य पाणीटंचाईमुक्त करण्याचा संकल्प असून कोकण विभागामध्येही तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड घेण्यात येत असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. कोकण भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाणवली, रत्नागिरीमधील अर्जुना व जगबुडी आणि रायगड जिल्ह्यातील गांधारी नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. कोकणात शेततळे देण्याबाबतही शासन विचार करत असून कोकण कृषी विद्यापीठाने दिलेला आराखडा तपासून याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात २०१५- १६ या आर्थिक वर्षामध्ये २ लाख १४ हजार २८६ कामे पूर्ण केली आहेत. १५ हजार ३०४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही योजना राबविलेल्या गावांमध्ये ११ लाख ६१ हजार ६२६ टीएमसी इतकी पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०१६- १७ वर्षातील ४३ हजार ५४५ कामे पूर्ण केली असून १७ हजार १२१ प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.>१६० गावांचा पाणीप्रश्न सुटलाकोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले की, एकात्मिक पाणलोट क्षेत्रात २६८ पैकी २५१ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून १६० गावे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे विभागात २९ लाख हेक्टर पैकी ८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. आतापर्र्यंत ६०० हेक्टर क्षेत्रावर फळबागायत केली असून पुढील वर्षी नरेगाच्या माध्यमातून २० हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.