शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
2
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
3
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
4
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
5
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
6
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
7
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
8
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
9
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
10
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
11
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
12
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
13
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
14
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
15
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
16
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
17
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
18
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
19
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
20
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
Daily Top 2Weekly Top 5

चार नद्यांचे पुनरुज्जीवन लवकरच करणार

By admin | Updated: August 25, 2016 05:42 IST

शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल.

नवी मुंबई : शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल. जलयुक्त शिवार प्रकल्पांच्या माध्यमातून राज्य पाणीटंचाईमुक्त करण्याचा संकल्प असून कोकण विभागामध्येही तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड घेण्यात येत असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. कोकण भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाणवली, रत्नागिरीमधील अर्जुना व जगबुडी आणि रायगड जिल्ह्यातील गांधारी नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. कोकणात शेततळे देण्याबाबतही शासन विचार करत असून कोकण कृषी विद्यापीठाने दिलेला आराखडा तपासून याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात २०१५- १६ या आर्थिक वर्षामध्ये २ लाख १४ हजार २८६ कामे पूर्ण केली आहेत. १५ हजार ३०४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही योजना राबविलेल्या गावांमध्ये ११ लाख ६१ हजार ६२६ टीएमसी इतकी पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०१६- १७ वर्षातील ४३ हजार ५४५ कामे पूर्ण केली असून १७ हजार १२१ प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.>१६० गावांचा पाणीप्रश्न सुटलाकोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले की, एकात्मिक पाणलोट क्षेत्रात २६८ पैकी २५१ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून १६० गावे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे विभागात २९ लाख हेक्टर पैकी ८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. आतापर्र्यंत ६०० हेक्टर क्षेत्रावर फळबागायत केली असून पुढील वर्षी नरेगाच्या माध्यमातून २० हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.