शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

चार नद्यांचे पुनरुज्जीवन लवकरच करणार

By admin | Updated: August 25, 2016 05:42 IST

शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल.

नवी मुंबई : शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल. जलयुक्त शिवार प्रकल्पांच्या माध्यमातून राज्य पाणीटंचाईमुक्त करण्याचा संकल्प असून कोकण विभागामध्येही तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड घेण्यात येत असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. कोकण भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाणवली, रत्नागिरीमधील अर्जुना व जगबुडी आणि रायगड जिल्ह्यातील गांधारी नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. कोकणात शेततळे देण्याबाबतही शासन विचार करत असून कोकण कृषी विद्यापीठाने दिलेला आराखडा तपासून याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात २०१५- १६ या आर्थिक वर्षामध्ये २ लाख १४ हजार २८६ कामे पूर्ण केली आहेत. १५ हजार ३०४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही योजना राबविलेल्या गावांमध्ये ११ लाख ६१ हजार ६२६ टीएमसी इतकी पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०१६- १७ वर्षातील ४३ हजार ५४५ कामे पूर्ण केली असून १७ हजार १२१ प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.>१६० गावांचा पाणीप्रश्न सुटलाकोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले की, एकात्मिक पाणलोट क्षेत्रात २६८ पैकी २५१ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून १६० गावे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे विभागात २९ लाख हेक्टर पैकी ८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. आतापर्र्यंत ६०० हेक्टर क्षेत्रावर फळबागायत केली असून पुढील वर्षी नरेगाच्या माध्यमातून २० हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.