शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

चार नद्यांचे पुनरुज्जीवन लवकरच करणार

By admin | Updated: August 25, 2016 05:42 IST

शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल.

नवी मुंबई : शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल. जलयुक्त शिवार प्रकल्पांच्या माध्यमातून राज्य पाणीटंचाईमुक्त करण्याचा संकल्प असून कोकण विभागामध्येही तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड घेण्यात येत असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. कोकण भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाणवली, रत्नागिरीमधील अर्जुना व जगबुडी आणि रायगड जिल्ह्यातील गांधारी नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. कोकणात शेततळे देण्याबाबतही शासन विचार करत असून कोकण कृषी विद्यापीठाने दिलेला आराखडा तपासून याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात २०१५- १६ या आर्थिक वर्षामध्ये २ लाख १४ हजार २८६ कामे पूर्ण केली आहेत. १५ हजार ३०४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही योजना राबविलेल्या गावांमध्ये ११ लाख ६१ हजार ६२६ टीएमसी इतकी पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०१६- १७ वर्षातील ४३ हजार ५४५ कामे पूर्ण केली असून १७ हजार १२१ प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.>१६० गावांचा पाणीप्रश्न सुटलाकोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले की, एकात्मिक पाणलोट क्षेत्रात २६८ पैकी २५१ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून १६० गावे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे विभागात २९ लाख हेक्टर पैकी ८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. आतापर्र्यंत ६०० हेक्टर क्षेत्रावर फळबागायत केली असून पुढील वर्षी नरेगाच्या माध्यमातून २० हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.