शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

चारही स्तंभ मजबूत झाल्यावर लोकशाही समृद्ध

By admin | Updated: April 21, 2017 23:59 IST

लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते.

पुणे : लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद यांच्यानंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी फडणवीस बोलत होते. पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, आॅल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष किरण जोशी, वसंत मुंडे, मंदार फणसे आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘कर्जमाफी हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मार्ग असू शकतो. मात्र, कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला तर आपण करंटे ठरू. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देणे, शेतीमालाला योग्य भाव देणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आदी गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.’’बापट म्हणाले, ‘‘पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. पत्रकार समर्पक भावनेतून काम करतात. त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यात आला.’’सत्काराला उत्तर देताना श्री श्री रविशंकर यांनी पत्रकार, उद्योजक, धर्मगुरू आणि राजकीय नेते यांनी एकत्रिपणे काम केले तर समाजाचा विकास गतीने होईल, असे सांगितले. शेतकऱ्यांमधील निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’च्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीदेखील दिली.रायकर म्हणाले, ‘‘पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून मागणी केली जात होती. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यास पाठिंबा दिला. सत्तेत आल्यानंतर त्यांनी कायदा मंजूर केला. तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन.’’वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य मराठी संघाला शासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी प्रास्ताविकात संजय भोकरे यांनी केली. राजा माने यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)