शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

By admin | Updated: December 25, 2016 18:42 IST

वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे येणारी कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 25 - वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे येणारी कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. नागपूर - वर्धा - चंद्रपूर महामार्गावरील जामठा शिवारात रविवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामुळे काही वेळ मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली होती. एमएच-४० / एफ-०९५२ क्रमांकाच्या कारमध्ये बसून पाच जण वर्धेहून नागपूरकडे येत होते. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. नागपूरनजीकच्या जामठा शिवारात पोहोचताच कारचालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित कार दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणा-या आयशर ट्रकवर (एमएच-४९/९१९२)  आदळली. त्यानंतर तेवढ्याच वेगात ही कार परत वर्धा मार्गावर येऊन पडली. कारचा वेग आणि  धडक एवढी जोरदार होती की आयशर ट्रकही उलटला अन् कारचे इंजिन तुटून १५ ते २० फूट दूर वेगळे होऊन पडले. कारमधील पाच पैकी चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ट्रकचालक राकेश शंभरकर यालाही या अपघातात जबर दुखापत झाल्याचे कळते. या अपघातामुळे नागपूर - वर्धा - चंद्रपूर मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. माहिती कळताच बुटीबोरी, हिंगणा आणि सोनेगाव तसेच गस्तीवरील पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याने आणि एक गंभीर जखमी असल्यामुळे मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी कारच्या नंबरवरून प्रयत्न सुरू केले.