शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभ स्फोटप्रकरणी चार अधिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: September 21, 2016 01:31 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील ईटरनीस कंपनीत झालेल्या स्फोटात दोन ठार, तर दोन जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी झाली.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील ईटरनीस कंपनीत झालेल्या स्फोटात दोन ठार, तर दोन जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी झाली. याप्रकरणी कंपनीतील ४ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.श्रीराम सावळापूरकर (वय ४२), विजय खाडे (वय ४७, दोघे रा. विमाननगर पुणे), विकास बर्गे (वय ३६, रा. जनता कॉलनी, दौंड) व देवेंद्रसिंह धामी (वय ३६, रा. खोपोली) या चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती ठाणेअंमलदार गोपाळ ओमासे यांनी दिली.कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रामधील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. औद्योगिक क्षेत्रामधील ईटरनीस या कंपनीमध्ये हायड्रोजनच्या रासायनिक अभिक्रियेदरम्यान झालेल्या भीषण स्फोटामुळे या विषयाला चालना मिळत आहे. ईटरनीस ही सुगंधी द्रव बनवण्याचा कच्चा माल उत्पादन करणारी कंपनी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायूचा वापर केला जातो. परिणामी, हायड्रोजनचा साठा या ठिकाणी केला जातो. त्यामुळे या घटनेतून जर धडा घेतला नाही, तर एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उपाययोजना हे एकमेव सूत्र सर्व कंपनीच्या व्यवस्थापनाला पाळावेच लागेल.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक उत्पादन करणारे एक महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या उद्योगांचे क्षेत्र मानले जाते. देशभरातून मोठ्या संख्येने कामगार या ठिकाणी येत असून अगदी जलद गतीने परिसरातील विकासात वाढ झालेली आहे.या औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक कंपनीमधील सुरक्षाव्यवस्था अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. त्यामुळे वारंवार होणारे अपघात व त्यामध्ये जाणारे कामगारांचे जीव याबाबत सहसा कुणीच बोलताना दिसत नाही. अपघातानंतर कंपनी निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यंत्रणा जागृत होतात. मात्र, यामधून आजपर्यंत काहीच साध्य झाले नसल्याचे दिसते. त्यामुळे परिणामी या औद्योगिक कंपनीमध्ये काम करणारे कामगार व परिसरातील गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. हा स्फोट झाल्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे सलग्न अधिकारीवर्गाने टाळले आहे. त्यामुळे झालेल्या प्रकारावर काय निर्णय घेतला जाणार? हा येथील सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न कायम राहणार आहे.(वार्ताहर)>सुरक्षा यंत्रणेचा कमीपणा हायड्रोजनसारख्या वायूचा स्फोट होणे ही गंभीर बाब आहे. मात्र, तरीही या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना अथवा सुरक्षा साधनांचा अभाव दिसतो. मोठ्या उद्योगसमूहाकडे देखील अग्निशामक वाहन गरजेचे आहे. मात्र, ते हातावर मोजण्याइतक्याच कारखान्यांनी व्यवस्था केल्याचे दिसते. रात्री घडलेल्या अपघाताला मदतकार्य सुरू करण्यासाठी वाट पाहणे हा सुरक्षा यंत्रणेचा कमीपणा दिसतो.>अधिकाऱ्यांचे दुर्लक्षकुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील जवळपास सर्वच कंपन्यांचे उच्च पदस्थ अधिकारी वर्ग पुण्याला वास्तव करीत असल्यामुळे रात्रीअपरात्री झालेल्या अपघातावर अथवा एखाद्या घटनेबाबत निर्णय घेण्यास व साधने उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात. तर, रात्र पाळीतील सुरक्षा यत्रंणा या येथील सुरक्षारक्षक व अगदीच याबाबत साधारण माहिती असणाऱ्यांच्या भरवशावर असल्याचे वास्तव पाहावयास मिळते.