शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी चौघे अटकेत

By admin | Updated: March 3, 2017 05:50 IST

ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने आणखी चौघांना अटक केल्याने या प्रकरणी कथित आरोपींची संख्या सात झाली आहे.

ठाणे : भिवंडी महापालिकेतील काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी पथकाने आणखी चौघांना अटक केल्याने या प्रकरणी कथित आरोपींची संख्या सात झाली आहे. त्या चौघांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौकडीचा म्हात्रेंच्या हत्येत सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्यामध्ये चॉपरने हल्ला करणाऱ्याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फेब्रुवारीत ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम सुरू असताना भिवंडीत म्हात्रे यांची रात्रीच्या सुमारास हल्लेखोऱ्यांनी गोळ्या झाडून आणि चॉपरने वार करून निर्घृण हत्या केली होती. ही हत्या त्यांच्या पुतण्याने केल्याचा आरोप आहे. याचदरम्यान, या हत्येप्रकरणी दिवसेंदिवस राजकीय हस्तक्षेप वाढू लागल्याने हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. पाटील यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारावर म्हात्रे यांचा अंगरक्षक जिग्नेश पटेल याला अटक केली. यातच आता ठाणे खंडणी पथकाने वज्रेश्वरीतून गणेश गोपीनाथ पाटील (३०), विशू उर्फ विश्वपाल बाळाराम पाटील (२९) तर भिवंडी खारबाव येथून शंकर झा (३८) आणि विद्येश सुदाम पाटील (३७) अशा चौघांना बुधवारी अटक केली. यामध्ये गणेशने चॉपरने म्हात्रे यांच्यावर हल्ला चढवला होता. विशूने मारेकऱ्यांना पळून जाण्यास मदत केली होती. तर विद्येशने या हत्येसाठी हत्यारे पुरवली असून, हत्येचा कट रचताना चौघे उपस्थित होते. तसेच हे चौघे जण प्रशांत म्हात्रेसाठी काम करीत होते. मात्र, म्हात्रे यांच्यावर गोळीबार करणारा अद्यापही फरार आहे. अटकेतील चौघांना गुरुवारी न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)