शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांची वारी!

By admin | Updated: January 30, 2015 03:53 IST

‘पंढरीची वारी’ हा विषय धार्मिक असल्याचा समज होता़ त्यामुळे संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासले

नवी दिल्ली : ‘पंढरीची वारी’ हा विषय धार्मिक असल्याचा समज होता़ त्यामुळे संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासले आणि शेवटी तिथे नवस बोलला जात नाही, पशुहत्या केली जात नाही, शारीरिक पीडा देणारे कोणतेही विधी नसतात. वारकरी हा पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनही आनंदी होतो असा हा निरागस दृष्टिकोन असलेला भलामोठा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे, असे ध्यानात येताच या चित्ररथाला मान्यता दिली. चार महिन्यांपूर्वी ही संकल्पना संरक्षण विभागाने मान्य केली. तत्कालीन सांस्कृतिक कार्य संचालक संजय पाटील, सहसंचालक मनोज सानप, कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे यांनी संरक्षण विभागाच्या चित्ररथ निवड समितीने ही संकल्पना मंजूर करावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या चित्ररथाची बांधणी व कलावंतांची रंगीत तालीम संरक्षण विभागाच्या रंगशाळेत सुरू होती़ त्या वेळी व अगदी २३ तारखेच्या रंगीत पथसंचलनाच्या वेळी नवे संचालक अजय अंबेकर यांनी अनेक बारकाव्यांवर काम केले. गैरसमज व समज या परीक्षेतून गेलेला हा चित्ररथ आज पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. ‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. सर्वप्रथम १९७१मध्ये वारली दिंडीच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ राजपथावर सादर झाला. त्यानंतर १९८०मध्ये ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ व १९८३मध्ये ‘बैल पोळा’या संकल्पनेवरील चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकावले होते. ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते. १९८८मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ला द्वितीय, २००७मध्ये ‘जेजुरीचा खंडेराय’ला तृतीय तर २००९मध्ये ‘धनगर’ या चित्ररथास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. (विशेष प्रतिनिधी)