शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

जीप उलटून ४ जण ठार; ६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 19:34 IST

लग्नाहून गावाकडे परतत असताना वऱ्हाडाची जीप उलटून चार जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना सेलू तालुक्यातील चिकलठाणा परिसरात १८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. - लग्नाहून गावाकडे परतत असताना वऱ्हाडाची जीप उलटून चार जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना सेलू तालुक्यातील चिकलठाणा परिसरात १८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़सेलू तालुक्यातील रायपूर येथील लग्नसमारंभासाठी जालना जिल्ह्यातील वाटुरफाटा येथील वऱ्हाडी एम़एच़२१-व्ही़७३६४ या जीपने आले होते़ लग्न लावून वऱ्हाडी मंडळी पुन्हा गावाकडे जाण्यासाठी जीपमधून निघाले होते़ एम़एच़२१-व्ही़७३६४ ही जीप सेलू तालुक्यातील चिकलठाणा पाटी परिसरात आली असता जीपवरचा चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. यामुळे झालेल्या अपघातात मंठा येथील कल्याण श्रीराम बादल (ईदलापूर), भीमराव नभाजी शिंंदे, शरद बालासाहेब रोहिणकर, गीताराम वायाळ (तिघेही रा़ वाटूर) हे जागीच ठार झाले़ तर आकाश राजेंद्र पांचाळ, रमेश गणपत खवणे, भानुदास अंबादास भगस, रामा गणेश कुऱ्हे, आप्पाराव कुंडलिकराव वायाळ, अच्युत दादाराव भगस हे गंभीर जखमी झाले. त्यातील आकाश पांचाळ, रमेश खवणे व भानुदास भगस यांना मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर रामा गणेश कुऱ्हे व आप्पाराव कुंडलिकराव वायाळ आणि अच्युत दादाराव भगस यांना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले़ त्यातील रामा कुऱ्हे व आप्पाराव वायाळ यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले़ आप्पाराव वायाळ हे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मामा आहेत़ दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलिस व चारठाणा आणि सेलू पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले़ जखमींना दवाखान्यात हलविण्यासाठी प्रवासी व इतरांनी मदत केली़