शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जीप उलटून ४ जण ठार; ६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 19:34 IST

लग्नाहून गावाकडे परतत असताना वऱ्हाडाची जीप उलटून चार जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना सेलू तालुक्यातील चिकलठाणा परिसरात १८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. - लग्नाहून गावाकडे परतत असताना वऱ्हाडाची जीप उलटून चार जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना सेलू तालुक्यातील चिकलठाणा परिसरात १८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़सेलू तालुक्यातील रायपूर येथील लग्नसमारंभासाठी जालना जिल्ह्यातील वाटुरफाटा येथील वऱ्हाडी एम़एच़२१-व्ही़७३६४ या जीपने आले होते़ लग्न लावून वऱ्हाडी मंडळी पुन्हा गावाकडे जाण्यासाठी जीपमधून निघाले होते़ एम़एच़२१-व्ही़७३६४ ही जीप सेलू तालुक्यातील चिकलठाणा पाटी परिसरात आली असता जीपवरचा चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. यामुळे झालेल्या अपघातात मंठा येथील कल्याण श्रीराम बादल (ईदलापूर), भीमराव नभाजी शिंंदे, शरद बालासाहेब रोहिणकर, गीताराम वायाळ (तिघेही रा़ वाटूर) हे जागीच ठार झाले़ तर आकाश राजेंद्र पांचाळ, रमेश गणपत खवणे, भानुदास अंबादास भगस, रामा गणेश कुऱ्हे, आप्पाराव कुंडलिकराव वायाळ, अच्युत दादाराव भगस हे गंभीर जखमी झाले. त्यातील आकाश पांचाळ, रमेश खवणे व भानुदास भगस यांना मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर रामा गणेश कुऱ्हे व आप्पाराव कुंडलिकराव वायाळ आणि अच्युत दादाराव भगस यांना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले़ त्यातील रामा कुऱ्हे व आप्पाराव वायाळ यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले़ आप्पाराव वायाळ हे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मामा आहेत़ दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलिस व चारठाणा आणि सेलू पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले़ जखमींना दवाखान्यात हलविण्यासाठी प्रवासी व इतरांनी मदत केली़