शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अस्वलाच्या हल्ल्यात चार ठार, दोन गंभीर जखमी

By admin | Updated: May 13, 2017 18:21 IST

जिल्ह्यातील खरताडा जंगलात सहाजणांवर हल्ला करणा-या अस्वलाला पोलीस आणि वनविभागाने गोळया झाडून ठार मारले आहे.

ऑनलाइन लोकमत 

चंद्रपूर, दि. 13 - ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रांत कक्ष क्र ९५ आलेवाही- किटाळी जंगलात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले. यामध्ये एक महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे, तर एक महिला व दोन युवक गंभीर जखमी आहे. दोघांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. एकावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा थरार शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडला. 

या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांच्या दबावानंतर वनविभागाने गोळ्या घालून अस्वलाला ठार केले. मृतकामध्ये रंजना अंबादास राउत(६०) व बिसन सोमा कुलमेथे(४०) रा. किटाळी आणि फारुख युसुफ शेख(३२) रा. खरकाडा यांचा समावेश आहे. जखमींमध्ये मीना दुधाराम राऊत(४५), सचिन बिसन कुलमेथे व कुणाल दुधाराम राऊत यांचा समावेश आहे. 
रंजना राऊत यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर बिसन कुलमेथे व फारुख शेख यांचा मृत्यू सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला.
 
किटाळीतील पाच जण व खरकाडा येथील एक जण नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी तेंदूपत्ता संकलनासाठी आलेवाही- किटाळी जंगलात गेले होते. सर्वजण तेंदूपत्ता संकलनात व्यस्त असताना अचानक एका अस्वलाने सर्वप्रथम रंजना राऊत यांच्यावर हल्ला चढविला. तिला वाचविण्यासाठी कुणाल राऊत अस्वलावर धावून गेला. त्यावेळी अस्वलाने त्यालाही कवेत घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुणाल झाडावर चढला. मात्र झाड लहान असल्याने ते खाली वाकले. अस्वलाने उडी घेऊन त्याच्या पायाचा लचका तोडला. त्यामुळे त्याची आई मीना राऊत धावून गेली. 
 
अस्वलाने तिलाही गंभीर जखमी केले. तेव्हा बिसन कुलमेथे, सचिन कुलमेथे व फारुख शेख यांनी अस्वलाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही गंभीर जखमी केले. त्या अवस्थेतही त्यांनी अस्वलाशी कडवी झुंज दिली. ही घटना माहिती पडताच आलेवाही खरकाडा, किटाळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील गावांमधील नागरिकही धावून आले. त्यांनी पोलीस व वनविभागाला याची माहिती दिली. अस्वालाच्या हल्ल्याचे दृश्य पाहून जमाव संतप्त झाला. 
 
तेव्हा काही वेळानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांना जमावाच्या संतापाला तोंड द्यावे लागले. पोलीस  दुपारी १ वाजता पोहोचली. यामुळे जमाव पुन्हा भडकला. लोकांचा रोष पाहून वनभिगाच्या पथकाने अस्वलाला गोळ्या घालून ठार केले. घटनास्थळी पंचक्रोशीतील दोन हजारांवर लोक जमले होते.
 
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे उपनेते आ.विजय वडेट्टीवार, नागभीड पं स सभापती प्रफुल्ल खापर्डे, जि प सदस्य कोजराम मरस्कोले, पं स सदस्य ठाणेश्वर कायरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय अधिकारी उमेश काळे सकाळपासूनच दाखल झाले होते. त्यांनी व ठाणेदार ओ बी अंबाडकर यांनी जखमींना तातडीने सिंदेवाही व चंद्रपूरला हलविले. वनविभागाने मृतक व जखमीच्या कुटुंबियांना मदत देणार असल्याचे दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष नायगमकर यांनी सांगितले.