शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या हल्ल्यात चार ठार, दोन गंभीर जखमी

By admin | Updated: May 13, 2017 18:21 IST

जिल्ह्यातील खरताडा जंगलात सहाजणांवर हल्ला करणा-या अस्वलाला पोलीस आणि वनविभागाने गोळया झाडून ठार मारले आहे.

ऑनलाइन लोकमत 

चंद्रपूर, दि. 13 - ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रांत कक्ष क्र ९५ आलेवाही- किटाळी जंगलात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले. यामध्ये एक महिला व दोन पुरुषाचा समावेश आहे, तर एक महिला व दोन युवक गंभीर जखमी आहे. दोघांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. एकावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा थरार शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडला. 

या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांच्या दबावानंतर वनविभागाने गोळ्या घालून अस्वलाला ठार केले. मृतकामध्ये रंजना अंबादास राउत(६०) व बिसन सोमा कुलमेथे(४०) रा. किटाळी आणि फारुख युसुफ शेख(३२) रा. खरकाडा यांचा समावेश आहे. जखमींमध्ये मीना दुधाराम राऊत(४५), सचिन बिसन कुलमेथे व कुणाल दुधाराम राऊत यांचा समावेश आहे. 
रंजना राऊत यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर बिसन कुलमेथे व फारुख शेख यांचा मृत्यू सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला.
 
किटाळीतील पाच जण व खरकाडा येथील एक जण नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी तेंदूपत्ता संकलनासाठी आलेवाही- किटाळी जंगलात गेले होते. सर्वजण तेंदूपत्ता संकलनात व्यस्त असताना अचानक एका अस्वलाने सर्वप्रथम रंजना राऊत यांच्यावर हल्ला चढविला. तिला वाचविण्यासाठी कुणाल राऊत अस्वलावर धावून गेला. त्यावेळी अस्वलाने त्यालाही कवेत घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुणाल झाडावर चढला. मात्र झाड लहान असल्याने ते खाली वाकले. अस्वलाने उडी घेऊन त्याच्या पायाचा लचका तोडला. त्यामुळे त्याची आई मीना राऊत धावून गेली. 
 
अस्वलाने तिलाही गंभीर जखमी केले. तेव्हा बिसन कुलमेथे, सचिन कुलमेथे व फारुख शेख यांनी अस्वलाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही गंभीर जखमी केले. त्या अवस्थेतही त्यांनी अस्वलाशी कडवी झुंज दिली. ही घटना माहिती पडताच आलेवाही खरकाडा, किटाळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील गावांमधील नागरिकही धावून आले. त्यांनी पोलीस व वनविभागाला याची माहिती दिली. अस्वालाच्या हल्ल्याचे दृश्य पाहून जमाव संतप्त झाला. 
 
तेव्हा काही वेळानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांना जमावाच्या संतापाला तोंड द्यावे लागले. पोलीस  दुपारी १ वाजता पोहोचली. यामुळे जमाव पुन्हा भडकला. लोकांचा रोष पाहून वनभिगाच्या पथकाने अस्वलाला गोळ्या घालून ठार केले. घटनास्थळी पंचक्रोशीतील दोन हजारांवर लोक जमले होते.
 
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे उपनेते आ.विजय वडेट्टीवार, नागभीड पं स सभापती प्रफुल्ल खापर्डे, जि प सदस्य कोजराम मरस्कोले, पं स सदस्य ठाणेश्वर कायरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय अधिकारी उमेश काळे सकाळपासूनच दाखल झाले होते. त्यांनी व ठाणेदार ओ बी अंबाडकर यांनी जखमींना तातडीने सिंदेवाही व चंद्रपूरला हलविले. वनविभागाने मृतक व जखमीच्या कुटुंबियांना मदत देणार असल्याचे दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष नायगमकर यांनी सांगितले.