शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मराठवाड्यात चार शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: October 3, 2015 03:44 IST

सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

औरंगाबाद : सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेवराई (जि. बीड) तालुक्यातील भोजगाव येथील भागवत भगवान काळे (४५) या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला शुक्रवारी सकाळी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे ३ एकर कोरडवाहू शेती आहे. काळे यांच्याकडे सोसायटीचे कर्ज व खासगी देणे असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. गेवराई(जि. बीड) शहरातील गौतम घनश्याम सुतार (रा. संघमित्र नगर, गेवराई) या अपंग शेतकऱ्याने मन्यारवाडी शिवारातील स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.तळणी (ता़ हदगाव, जि. नांदेड) येथील रंगराव काशीबा शिरडकर (५५) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून १ आॅक्टोबर रोजी गळफास लावून आत्महत्या केली. चापानेर (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील बालू किसन थोरात (५७) या शेतकऱ्याने सततच्या दुष्काळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दुष्काळामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या घरातील मंडळींनी सांगितले.