शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

चार उपाधीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: August 25, 2015 02:47 IST

पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याच्या कालावधी उलटून गेला असलातरी गृह विभागाकडून वरिष्ट अधिकाऱ्यांच्या टप्याटप्याने व सोयीनुसार बदल्या

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याच्या कालावधी उलटून गेला असलातरी गृह विभागाकडून वरिष्ट अधिकाऱ्यांच्या टप्याटप्याने व सोयीनुसार बदल्या करण्याचे धोरण सुरु राहिले आहे. ठाणे पोलीस मुख्यालयायातील उपायुक्त सुनील लोखंडे यांच्यासह अन्य चार उपअधीक्षकांच्या विनंतीवरुन विशेष बाब म्हणून सध्याच्या ठिकाणाहून अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या मे/जून मध्ये केल्या जातात. मात्र पाच अधिकाऱ्यांनी विनंती केल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासाठी राज्य पोलीस अधिनियम १९५१च्या कलम २२ (न)(२) अन्वये हा निर्णय घेण्यात आला. उपायुक्त लोखंडे यांची अमरावती (ग्रामीण) विभागात अप्पर अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर उपअधीक्षक सर्वश्री (कंसात कोठून-कोठे): नरेश मेघराजानी (मनमाड- वाशिम), रामेश्वर सुपले ( पोलीस अ‍ॅकडमी नाशिक-मुंबई), राहुल खाडे ( पेण- मनमाड) व बजरंग बनसोडे (माहूर-अहमदनगर शहर) बदली करण्यात आलेली आहे. यापैकी खाडे व बनसोडे यांची काही महिन्यापूर्वी बदली झालेल्या ठिकाणी ते हजर झालेले नाहीत. त्यांनी अन्यत्र बदली करुन घेतली आहे. (प्रतिनिधी)राज्यात ७६३ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्यागेली वर्षभर राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयाच्या अधिपत्याखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत असलेल्या ७६३ परिविक्षाधीन उपनिरीक्षकांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये सर्वाधिक २३० जणांना मुंबई आयुक्तालयातर्गंत नेमण्यात आलेले आहे. पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी नुकताच त्याबाबतचा आदेश जारी केला असून त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याची सूचना घटकप्रमुखांना केली आहे.राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने (एमपीएससी) सरळ सेवा भरतीद्वारे उपनिरीक्षक पदाची परीक्षा उर्त्तीण ७६३ उमेदवारांनी एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण नाशिक पोलीस अकादमीमध्ये केले. ११० क्रमांकाच्या या तुकडीतील उमेदवारांची गेल्यावर्षी आठ आॅगस्टला राज्यभरातील विविध पोलीस घटकांमध्ये एक वर्षासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली होती. त्यांचा हा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना नियमित स्वरुपाच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. बहुतांश अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. ७६३ उपनिरीक्षकांपैकी सर्वाधिक २३०जण मुंबई पोलीस दलाला मिळालेले आहेत. त्यांच्या नियुक्त्या कायमस्वरुपी केल्याने सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.