शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

चार इमारतींना चार आठवड्यांसाठी संरक्षण

By admin | Updated: September 20, 2016 04:51 IST

दिघा येथील चार बेकायदेशीर इमारतींना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी संरक्षण दिले

मुंबई : दिघा येथील चार बेकायदेशीर इमारतींना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी संरक्षण दिले आहे. चार आठवडे या इमारतींवर कारवाई न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने एमआयडीसी व कोर्ट रिसीव्हरला दिला आहे.दिघा येथील अमृतधाम, अवधुत छाया, दत्तकृपा आणि दुर्गामाता प्लाझा या चार इमारतींमधील रहिवाशांनी सरकारने बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण केले तरी त्याचा लाभ न घेता इमारती रिकाम्या करण्याची हमी उच्च न्यायालयाला दिली होती. याच हमीच्या आधारावर उच्च न्यायालयाने या चारही इमारतींमधील रहिवाशांना काही काळ संरक्षण दिले होते. ती मुदत १ सप्टेंबर रोजी संपल्याने पुन्हा संबंधित रहिवाशांनी इमारतींवर कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केले.राज्य सरकाने इमारती नियमित करण्यासंदर्भात धोरण आखले असल्याने इमारतींवर कारवाई करू नये, असे रहिवाशांनी अर्जात म्हटले आहे. (प्रतिनिधी) उच्च न्यायालयाने रहिवाशांना त्यांनी दिलेल्या हमीची आठवण करून देत दिलासा देण्यास नकार दिला. मात्र रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवड्यांचे संरक्षण दिले आहे. एमआयडीसी व कोर्ट रिसीव्हरला या चार आठवड्यांत संबंधित इमारतींवर कारवाई न करण्याचा आदेश दिला.