शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

नऊ वर्षांत चार हजार बालकामगारांची सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:42 IST

पोलिसांची आकडेवारी : तुटपुंजा पगारात घेतले जाते राबवून; दोन हजार मालकांना कोठडीची हवा

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरीवर दिवसरात्र राबविणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने मालकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे बालमजुरीला चाप बसण्यास मदत होत असून, गेल्या ९ वर्षांत ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये जवळपास २ हजार मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह नेपाळमधून येणाºया बालमजुरांची संख्या अधिक असून, अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ही मुले मुंबईत काम करतात. तुटपुंज्या पगारात त्यांना दिवसरात्र राबवून घेतले जाते.घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरीकाम, चामड्याचा व्यवसाय, प्लॅस्टिक, मोल्डिंगसह विविध लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी पगारात, कमी खर्चात लहान मुलांकडून काम होत असल्यामुळे मालक बालमजुरांसाठी आग्रही असतात.

पोलीस वेळोवेळी अशा ठिकाणी धाडी टाकून बालमजुरांची सुटका करतात. त्यांना पुन्हा पालकांच्या हवाली करतात. मात्र, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले काही काळ गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काम करताना दिसतात. यावर उपाय म्हणून शहरात कोणत्या परिसरात जास्तीत जास्त बाजमजूर काम करतात त्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. त्या-त्या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजसेवा शाखेने छापे टाकण्यास सुरुवात केली.

मुंबईतून गेल्या ९ वर्षात ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यास पोलिसांना यश आले. यामध्ये गेल्या वर्षी ३५८ बालमजुरांचा समावेश होता, तर १९४ मालकांना कोठडीची हवा खावी लागली. त्यामुळे कायद्यातील बदलांमुळे मालकांवर चाप बसत आहे.

कायद्यातील सुधारणेमुळे वचकमार्च २०१५ मध्ये बालमजूर विरोधी कायद्यात सुधारणा करत ३७० (१) कलमाचा समावेश करण्यात आला. हे कलम अजामीनपात्र असून किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालमजूर ठेवण्याआधीच सावध व्हावे.

कामाच्या ठिकाणी अनेक गैरसोयीच्उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर बालमजूर नोकरीच्या शोधार्थ मुंबईत येतात.च्आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ ते १५ वयोगटातील लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना अत्यल्प पगार दिला जातो.च्मालक या लहान मुलांची एका खोलीत किंवा उद्योगाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतो. मात्र राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेत अनेक गैरसोयी असल्याने या मुलांची हेळसांड होते.