शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांत चार हजार बालकामगारांची सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:42 IST

पोलिसांची आकडेवारी : तुटपुंजा पगारात घेतले जाते राबवून; दोन हजार मालकांना कोठडीची हवा

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरीवर दिवसरात्र राबविणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने मालकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे बालमजुरीला चाप बसण्यास मदत होत असून, गेल्या ९ वर्षांत ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये जवळपास २ हजार मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह नेपाळमधून येणाºया बालमजुरांची संख्या अधिक असून, अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ही मुले मुंबईत काम करतात. तुटपुंज्या पगारात त्यांना दिवसरात्र राबवून घेतले जाते.घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरीकाम, चामड्याचा व्यवसाय, प्लॅस्टिक, मोल्डिंगसह विविध लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी पगारात, कमी खर्चात लहान मुलांकडून काम होत असल्यामुळे मालक बालमजुरांसाठी आग्रही असतात.

पोलीस वेळोवेळी अशा ठिकाणी धाडी टाकून बालमजुरांची सुटका करतात. त्यांना पुन्हा पालकांच्या हवाली करतात. मात्र, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले काही काळ गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काम करताना दिसतात. यावर उपाय म्हणून शहरात कोणत्या परिसरात जास्तीत जास्त बाजमजूर काम करतात त्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. त्या-त्या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजसेवा शाखेने छापे टाकण्यास सुरुवात केली.

मुंबईतून गेल्या ९ वर्षात ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यास पोलिसांना यश आले. यामध्ये गेल्या वर्षी ३५८ बालमजुरांचा समावेश होता, तर १९४ मालकांना कोठडीची हवा खावी लागली. त्यामुळे कायद्यातील बदलांमुळे मालकांवर चाप बसत आहे.

कायद्यातील सुधारणेमुळे वचकमार्च २०१५ मध्ये बालमजूर विरोधी कायद्यात सुधारणा करत ३७० (१) कलमाचा समावेश करण्यात आला. हे कलम अजामीनपात्र असून किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालमजूर ठेवण्याआधीच सावध व्हावे.

कामाच्या ठिकाणी अनेक गैरसोयीच्उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर बालमजूर नोकरीच्या शोधार्थ मुंबईत येतात.च्आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ ते १५ वयोगटातील लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना अत्यल्प पगार दिला जातो.च्मालक या लहान मुलांची एका खोलीत किंवा उद्योगाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतो. मात्र राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेत अनेक गैरसोयी असल्याने या मुलांची हेळसांड होते.