शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

नऊ वर्षांत चार हजार बालकामगारांची सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:42 IST

पोलिसांची आकडेवारी : तुटपुंजा पगारात घेतले जाते राबवून; दोन हजार मालकांना कोठडीची हवा

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरीवर दिवसरात्र राबविणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने मालकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे बालमजुरीला चाप बसण्यास मदत होत असून, गेल्या ९ वर्षांत ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये जवळपास २ हजार मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह नेपाळमधून येणाºया बालमजुरांची संख्या अधिक असून, अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ही मुले मुंबईत काम करतात. तुटपुंज्या पगारात त्यांना दिवसरात्र राबवून घेतले जाते.घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरीकाम, चामड्याचा व्यवसाय, प्लॅस्टिक, मोल्डिंगसह विविध लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी पगारात, कमी खर्चात लहान मुलांकडून काम होत असल्यामुळे मालक बालमजुरांसाठी आग्रही असतात.

पोलीस वेळोवेळी अशा ठिकाणी धाडी टाकून बालमजुरांची सुटका करतात. त्यांना पुन्हा पालकांच्या हवाली करतात. मात्र, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले काही काळ गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काम करताना दिसतात. यावर उपाय म्हणून शहरात कोणत्या परिसरात जास्तीत जास्त बाजमजूर काम करतात त्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. त्या-त्या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजसेवा शाखेने छापे टाकण्यास सुरुवात केली.

मुंबईतून गेल्या ९ वर्षात ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यास पोलिसांना यश आले. यामध्ये गेल्या वर्षी ३५८ बालमजुरांचा समावेश होता, तर १९४ मालकांना कोठडीची हवा खावी लागली. त्यामुळे कायद्यातील बदलांमुळे मालकांवर चाप बसत आहे.

कायद्यातील सुधारणेमुळे वचकमार्च २०१५ मध्ये बालमजूर विरोधी कायद्यात सुधारणा करत ३७० (१) कलमाचा समावेश करण्यात आला. हे कलम अजामीनपात्र असून किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालमजूर ठेवण्याआधीच सावध व्हावे.

कामाच्या ठिकाणी अनेक गैरसोयीच्उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर बालमजूर नोकरीच्या शोधार्थ मुंबईत येतात.च्आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ ते १५ वयोगटातील लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना अत्यल्प पगार दिला जातो.च्मालक या लहान मुलांची एका खोलीत किंवा उद्योगाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतो. मात्र राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेत अनेक गैरसोयी असल्याने या मुलांची हेळसांड होते.