शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

किल्ले अंजनेरी

By admin | Updated: April 30, 2017 02:40 IST

किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना

- गौरव भांदिर्गे

अंजनीसुत हनुमानाचे जन्मस्थान असलेला किल्ले अंजनेरीगडदर्शन :- किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना सासू आणि नवरी म्हणतात. गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते. या वाटेने गावाला लागून असलेला डोंगर उजव्या हाताने वर चढून गेल्यावर आपण जीपगाडीच्या मार्गावर येतो. पुढे कच्च्या रस्त्याने साधारण अर्ध्या तासानंतर आपण आम्रवृक्षांशेजारी पोहोचतो. तेथून उजव्या हाताने पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढाई करायची. साधारण १००-१२५ पायऱ्या, मध्येच सपाटी, पुन्हा पायऱ्या असे टप्पे पार केल्यावर आपण दोन कातळकड्यांमधील खिंडीच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून संपूर्ण मार्ग पायऱ्यांचा आहे.या पायऱ्यांनी जात असताना डाव्या बाजूस कातळात खोदलेली एक जैन गुंफा आहे. तिथून खिंडीतल्या पायऱ्यांनी किल्ल्याच्या सपाटीवर पोहोचायचे. सपाटीवर कोरडे टाके व भग्न तटबंदीचे अवशेष दिसतात, तसेच वर चढून गेल्यावर आपण हनुमान तळ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने कातळात खोदलेल्या सीतागुंफेत पोहोचतो. येथे काही शिल्पे, चौकटी प्रवेशद्वार, दगडी घडीव पायऱ्या, द्वारपालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. येथून गर्द झाडीतून बालेकिल्ल्यावर पोहोचायचे. ही वाट म्हणजे खडी चढाई आहे. शासनाने रेलिंग लावलेल्या आहेत. याच्या आधारे वर चढाई करावी व मधल्या टप्प्यावर डाव्या बाजूला जावे. आपणास एक कातळकोरीव गुंफा लागते. येथेच हनुमानाचा जन्म झाला, असे सांगितले जाते. पुन्हा रेलिंगकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. येथून १५ मि. चालून गेल्यावर आपण अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. या मंदिरात अंजनीमातेची मूर्ती व तिच्या मांडीवर बसलेला हनुमान अशी मूर्ती आहे. मंदिरामागेच इतिहासकालीन इमारतींचे चौथरे आहेत. परतीसाठी आल्यावाटेने परत जावे. जाताना अंजनेरी गावात १२व्या शतकातील हिंदू व जैन मंदिरे आवर्जून पाहावीत व तेथून ४ कि.मी. अंतरावर असलेले जगातील सर्वांत मोठे नाणिसंग्रहालय पाहावे.किल्ल्यावर जाण्याच्या वाटानाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडायची व २० कि.मी. अंतरावर असलेल्या अंजनेरी फाट्यावर उतरायचे. येथून डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने चालू लागायचे. येथून अंजनेरी गावात पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो.इतिहासअंजनेरी किल्ल्याचा उल्लेख अगदी राष्ट्रकुट काळापासून मिळतो. हा परिसर चालुक्यांच्या अंमलाखाली होता. त्या वेळी अंजनेरी गाव त्र्यंबकेश्वरहून मोठे होते. दीड हजार वर्षांपूर्वी गवळी राजाची राजधानी होती. शिवकालात आॅक्टोबर १६७०मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड जिंकून घेतला, त्याच वेळी अंजनेरीसुद्धा स्वराज्यात आला. पुढे १७५०मध्ये निजामाच्या ताब्यात गेला. पुढे पेशवे काळात राघोबादादा पेशवे यांनी किल्ल्यावर विश्रांतीसाठी एक वाडा बांधला होता. नंतर इंग्रजांनी हनुमान तळ्याच्या काठावर थंड हवेचे ठिकाण म्हणून एक बंगला बांधला होता. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.