शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

किल्ले अंजनेरी

By admin | Updated: April 30, 2017 02:40 IST

किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना

- गौरव भांदिर्गे

अंजनीसुत हनुमानाचे जन्मस्थान असलेला किल्ले अंजनेरीगडदर्शन :- किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना सासू आणि नवरी म्हणतात. गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते. या वाटेने गावाला लागून असलेला डोंगर उजव्या हाताने वर चढून गेल्यावर आपण जीपगाडीच्या मार्गावर येतो. पुढे कच्च्या रस्त्याने साधारण अर्ध्या तासानंतर आपण आम्रवृक्षांशेजारी पोहोचतो. तेथून उजव्या हाताने पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढाई करायची. साधारण १००-१२५ पायऱ्या, मध्येच सपाटी, पुन्हा पायऱ्या असे टप्पे पार केल्यावर आपण दोन कातळकड्यांमधील खिंडीच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून संपूर्ण मार्ग पायऱ्यांचा आहे.या पायऱ्यांनी जात असताना डाव्या बाजूस कातळात खोदलेली एक जैन गुंफा आहे. तिथून खिंडीतल्या पायऱ्यांनी किल्ल्याच्या सपाटीवर पोहोचायचे. सपाटीवर कोरडे टाके व भग्न तटबंदीचे अवशेष दिसतात, तसेच वर चढून गेल्यावर आपण हनुमान तळ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने कातळात खोदलेल्या सीतागुंफेत पोहोचतो. येथे काही शिल्पे, चौकटी प्रवेशद्वार, दगडी घडीव पायऱ्या, द्वारपालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. येथून गर्द झाडीतून बालेकिल्ल्यावर पोहोचायचे. ही वाट म्हणजे खडी चढाई आहे. शासनाने रेलिंग लावलेल्या आहेत. याच्या आधारे वर चढाई करावी व मधल्या टप्प्यावर डाव्या बाजूला जावे. आपणास एक कातळकोरीव गुंफा लागते. येथेच हनुमानाचा जन्म झाला, असे सांगितले जाते. पुन्हा रेलिंगकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. येथून १५ मि. चालून गेल्यावर आपण अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. या मंदिरात अंजनीमातेची मूर्ती व तिच्या मांडीवर बसलेला हनुमान अशी मूर्ती आहे. मंदिरामागेच इतिहासकालीन इमारतींचे चौथरे आहेत. परतीसाठी आल्यावाटेने परत जावे. जाताना अंजनेरी गावात १२व्या शतकातील हिंदू व जैन मंदिरे आवर्जून पाहावीत व तेथून ४ कि.मी. अंतरावर असलेले जगातील सर्वांत मोठे नाणिसंग्रहालय पाहावे.किल्ल्यावर जाण्याच्या वाटानाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडायची व २० कि.मी. अंतरावर असलेल्या अंजनेरी फाट्यावर उतरायचे. येथून डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने चालू लागायचे. येथून अंजनेरी गावात पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो.इतिहासअंजनेरी किल्ल्याचा उल्लेख अगदी राष्ट्रकुट काळापासून मिळतो. हा परिसर चालुक्यांच्या अंमलाखाली होता. त्या वेळी अंजनेरी गाव त्र्यंबकेश्वरहून मोठे होते. दीड हजार वर्षांपूर्वी गवळी राजाची राजधानी होती. शिवकालात आॅक्टोबर १६७०मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड जिंकून घेतला, त्याच वेळी अंजनेरीसुद्धा स्वराज्यात आला. पुढे १७५०मध्ये निजामाच्या ताब्यात गेला. पुढे पेशवे काळात राघोबादादा पेशवे यांनी किल्ल्यावर विश्रांतीसाठी एक वाडा बांधला होता. नंतर इंग्रजांनी हनुमान तळ्याच्या काठावर थंड हवेचे ठिकाण म्हणून एक बंगला बांधला होता. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.