शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

माजी मंत्री तरी पाणीप्रश्नांची जंत्री...!

By admin | Updated: February 4, 2015 23:51 IST

गुहागर तालुका : वर्षानुवर्षे टँकरशी अखंड नाते...

संकेत गोयथळे - गुहागर तालुक्यात जिल्ह्याच्या तुलनेत सर्वांत कमी पावसाची नोंद होते. असे शासकीय आकडेवारीनुसार स्पष्ट होते. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमुळे पाणी साठवण क्षमता कमी आहे. यातूनच धोपावे, साखरी त्रिशूळ, पडवे आदी गावांचा पाणीप्रश्न न सुटल्याने वर्षानुवर्षे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तालुक्याला भास्कर जाधवांच्या रुपाने मंत्रिपद मिळूनही अद्याप या गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही.आमदार भास्कर जाधव यांनी तालुक्याचा पाण्याचा कृती टंचाई आराखडा बनवण्यासाठी जानेवारी अखेर गुहागर पंचायत समितीमध्ये विशेष बैठक घेतली. त्यानुसार साखरीत्रिशूळ, मधील गवळवाडी, पालशेत निओशीमधील भोसलेवाडी वरची वाडी, काताळेमधील नवानगर, धोपावेमधील तरीबंदर, जाधववाडी, पाटीलवाडी, गुडेकरवाडी, विघ्नहर्तावाडी, हनुमानवाडी, पडवेमधील वरील मोहल्ला, रिफाझ मोहल्ला, खतीब मोहल्ला, भाटलेवाडी, उगवतवाडी, मावळतवाडी, रहिमान मोहल्ला, शिवणेमधील मधलीवाडी, ठोंबरेवाडी, दहयांबेवाडी, खालची वाडी, गावकरवाडी, मेस्त्रीवाडी, आबलोली व पाभरेमधील धनगरवाडी आदी ९ गावे व २६ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.तालुक्यातील पाणी टंचाईचे प्रमाण कमी होत असले तरी विहिरी आटल्यामुळे विंधन विहिरींचे पाणी कमी झाल्याने व नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याप्रमाणे गेल्या वर्षी ८ गावांमधील ३८ वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. ही झळ कमी करण्यासाठी टंचाई कृती आराखडा बैठकीतून या गावातील ११ वाड्यांसाठी नवीन विंधन विहीर खोदाईचे नियोजन करण्यात आले आहे. दोन गावांतील २ वाड्यांसाठी विंधन विहीर दुरुस्ती, तर चिखली मांडकरवाडी येथील बंद पडलेली नळपाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु करुन येथील एक गाव एका वाडीतील पाणी टंचाईवर मात करण्यात येणार आहे.अडूर कोंडकारुळ येथील पाणीटंचाई यावेळी टळली आहे. येथे नवीन नळपाणी योजना सुरु झाली आहे. शिवणे येथील नळपाणी योजना बंद पडल्याने येथील आठ वाड्यांना टंचाईची झळ बसणार आहे. निओशी - वरचीवाडी येथे यावर्षी टंचाईची झळ पोहोचली. परंतु येथील भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळ्या योजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शीर टाकेवाडीतील विहिरीला पाणी भरपूर असून, या ठिकाणी सौरऊर्जेवर पंप बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाटपन्हाळे गावाची नळपाणी योजना बंद पडली आहे. अन्य योजनातून यावर मात करण्याचे नियोजन चालू असून ग्रामपंचायतीला महसूल मिळवून देणाऱ्या शृंगारतळी बाजारपेठेचा मात्र या नियोजनात विचार झालेला नाही.आबलोली गावातील धनगरवाडी डोंगरमाथ्यावर वसल्याने येथे जाणारा रस्ता हा तीव्र चढावाचा आहे. त्यामुळे येथे टँकर नेण्यास वेळ लागतो.पाभरे धनगरवाडीची पाणीटंचाई आराखड्यात भर पडली आहे. या धनगरवाड्यांना पाण्यासाठी दरवर्षी काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. यावर कोणतेही उपाय होत नसल्याने या वाड्यांची पाणीटंचाई अटळ आहे.काहीनी राजरोसपणे धरणातून चोरट्या पद्धतीने पाईप टाकून कोणतीही परवानगी न घेता बांधकाम विभागाच्या रस्त्यानजीक खोदाई करुन तब्बल तीन ते चार किलोमीटर पाईपलाईनद्वारे २४ तास पाण्याची लूट सुरु केली. यातूनच सध्या मोडकाआगर धरणावर अवलंबून असणाऱ्या गुहागर नगरपंचायतीसह असगोली, पालशेत, वरवेली गावांना आज पुरेसे पाणी मिळत असले तरी भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येईल हे लक्षात घेऊन संबंधित ग्रामस्थांनी याबाबत उठाव करावा लागेल, असे म्हटले जात आहे. आता कठोर उपाययोजनांची गरज आहे.धोपावेमधील काही वाड्यांमध्ये वर्षानुवर्षे पाणीटंचाई असते. निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय सभांतून येथे नळपाणी योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात याबाबत ठोस हालचाल न झाल्याने निवडणूक काळात हा विषय चर्चेचा राहिला. धोपावे गावाला मात्र यावेळीही पाणीटंचाई टळलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.बॅरलभर पाण्यासाठी...पडवे गावाचीही याहून वेगळी स्थिती नाही. खाडीकिनारी डोंगराच्या पायथ्याशी दाटीवाटीने वसलेल्या गावात पाणी स्रोत कमी आहेत. मोठी नळपाणी योजनाही नसल्याने येथील सर्वच वाड्यांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे; तर अन्य गावातून बॅरलच्या हिशोबाने पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते.साखरी त्रिशूळची व्यथादरवर्षी बहुतांश वेळा दाभोळखाडी किनारी वसलेल्या साखरी त्रिशूळ गावात तालुक्यातील पहिला पाण्याचा टँकर सुरु होतो, ही आजपर्यंतची स्थिती आहे. मागील काही वर्षांत टंचाईग्रस्त गावांचे प्रमाण तेवढेच राहिले असले तरी या सर्व वाड्यांना एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तारेवरची कसरत करावी लागते. यावर्षी जिल्हा परिषदेकडे चार नवीन टँकर आल्याने यावेळी दोन टँकर मिळतील, अशी अपेक्षा आहे.बंधाऱ्यांना पाणीच नाहीतालुका कृषी विभागाच्यावतीने अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. परंतु बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याने हे बंधारे कोरडे पडले आहेत. ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती सदस्यांना विचारात न घेता हे बंधारे बांधले गेल्याने कृषी विभागाचे नियोजन पूर्णत: चुकले असून, शेती लागवडीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नव्याने बंधारे बांधण्याची वेळ आली आहे.मोडकाआगरच्या पाण्यासाठी प्रयत्नगुहागरमधील वाढत्या पर्यटनातून भविष्यात प्लॉटिंग व बंगलोज्मुळे गावाची लोकसंख्या संख्या वाढणार आहे. पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे काहींनी मोडका आगर धरणाचे पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुुरु केले आहेत.