शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे निधन

By admin | Updated: December 2, 2014 14:55 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंतुले हे उत्तम प्रशासक व धडाडीचे निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जात होते.  

अब्दुल रेहमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी रायगड जिल्ह्यात झाला होता. कला शाखेत पदवी घेतल्यावर अंतुले यांनी कायद्याचीही पदवी घेतली होती. १९४५ पासून अंतुले यांनी सामाजिक कार्यात सक्रीय झाले. १९६२ ते १९७६ या कालावधीत ते आमदार म्हणूनही निवडून आले. या कालावधीत त्यांनी न्याय, सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यांचे कामकाज पाहिले. गांधी घराण्याचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. १९७६ मध्ये ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. आणीबाणीच्या काळात राज्यसभेत त्यांनी खंबीरपणे इंदिरा गांधी यांची पाठराखण केली होती. १९८० साली राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले व अंतुले यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. धडाडीचे आणि झटपट निर्णय व उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी अल्पावधीतच छाप पाडली. अनेक वर्षांपासून रखडलेले जिल्ह्यांचे विभाजनही अंतुलेनी झटपट करुन दाखवले. लोकहितासाठी त्यांनी विविध योजनाही राबवल्या. शेतक-यांना कर्जमाफी, पेंशनवाढ, संजय गांधी निराधार योजना असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय अंतुलेंनी घेतले. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून अंतुले ओळखले जात होते.  मात्र इंदिरा गांधी यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानला मदत करण्यासाठी सिमेंट घोटाळा झाला व अंतुले यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. 

१९८५ मध्ये अंतुले पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आले. १९८९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली व त्यानंतर ते केंद्रातच रमले. केंद्रात आरोग्य, जलसंवर्धन अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री म्हणूून काम केले होते. मात्र २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गींतेनी अंतुले यांचा पराभव केला व त्यानंतर अंतुले सक्रीय राजकारणापासून दूर गेले.

ए. आर. अंतुले हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारही सुरु होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. रायगडमधील आंबेत या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लोकहितासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या होत्या. एक उत्तम प्रशासक व खंबीर नेतृत्व गमावले अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.