शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे निधन

By admin | Updated: December 2, 2014 14:55 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अंतुले हे उत्तम प्रशासक व धडाडीचे निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जात होते.  

अब्दुल रेहमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी रायगड जिल्ह्यात झाला होता. कला शाखेत पदवी घेतल्यावर अंतुले यांनी कायद्याचीही पदवी घेतली होती. १९४५ पासून अंतुले यांनी सामाजिक कार्यात सक्रीय झाले. १९६२ ते १९७६ या कालावधीत ते आमदार म्हणूनही निवडून आले. या कालावधीत त्यांनी न्याय, सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यांचे कामकाज पाहिले. गांधी घराण्याचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. १९७६ मध्ये ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. आणीबाणीच्या काळात राज्यसभेत त्यांनी खंबीरपणे इंदिरा गांधी यांची पाठराखण केली होती. १९८० साली राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले व अंतुले यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. धडाडीचे आणि झटपट निर्णय व उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी अल्पावधीतच छाप पाडली. अनेक वर्षांपासून रखडलेले जिल्ह्यांचे विभाजनही अंतुलेनी झटपट करुन दाखवले. लोकहितासाठी त्यांनी विविध योजनाही राबवल्या. शेतक-यांना कर्जमाफी, पेंशनवाढ, संजय गांधी निराधार योजना असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय अंतुलेंनी घेतले. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून अंतुले ओळखले जात होते.  मात्र इंदिरा गांधी यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानला मदत करण्यासाठी सिमेंट घोटाळा झाला व अंतुले यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. 

१९८५ मध्ये अंतुले पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आले. १९८९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली व त्यानंतर ते केंद्रातच रमले. केंद्रात आरोग्य, जलसंवर्धन अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री म्हणूून काम केले होते. मात्र २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गींतेनी अंतुले यांचा पराभव केला व त्यानंतर अंतुले सक्रीय राजकारणापासून दूर गेले.

ए. आर. अंतुले हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारही सुरु होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. रायगडमधील आंबेत या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लोकहितासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या होत्या. एक उत्तम प्रशासक व खंबीर नेतृत्व गमावले अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.