शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपटसृष्टीला अनंत माने यांचा विसर

By admin | Updated: March 22, 2015 01:05 IST

तमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे.

संदीप आडनाईक ल्ल कोल्हापूरतमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे. चित्रपटसृष्टीतील ६५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ५७ चित्रपट दिग्दर्शित केले. संकलण, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, प्रसंगी तोंडाला रंग फासून ते मॉबसिनही करायचे. अभिनय असो की कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन किंवा निर्मिती आणि वितरण या सर्व क्षेत्रात त्यांनी कामाचा ठसा उमटवला.मराठी चित्रपटांच्या पडत्या काळात माने यांनी ‘सांगत्ये ऐका’सारखा तमाशाप्रधान चित्रपट बनविला आणि पुण्यात त्याने तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला. अजूनही हा विक्रम मराठी चित्रपटाने मोडलेला नाही. माने यांनी मायभूमी कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती केली. इतकेच नव्हे तर कलाकार, तंत्रज्ञही येथील घेण्याचा अट्टहास धरला. आज जे काही कलावंत त्यांच्यामुळे शिखरावर आहेत, त्यांनाही माने यांचा विसर पडला आहे. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या कलावंतांचा यथोचित सन्मान सरकारदरबारी झाला. मात्र आजची परिस्थिती पालटली आहे. मराठी चित्रपटांना संजिवनी देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करावा, असे आता सरकार दरबारी वाटत नाही. कोल्हापूर चित्रनगरीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या माने यांच्यासारख्या द्रष्ट्या कलावंताची कोल्हापुरात साधी नावनिशाणीही नाही. त्यांच्या नावाने येथे एखादे सभागृहही नाही. कोल्हापुरातील एका रस्त्याला आणि चौकाला महानगरपालिकेने त्यांचे नाव दिले होते, पण आज त्याचा ठावठिकाणा शोधावा लागतो. माने यांनी तमाशाप्रधान चित्रपटांबरोबरच ‘मानिनी’, ‘सुशीला’सारखे सामाजिक आशयाचे लोकनाट्याला सन्मान देणारे चित्रपटही दिले. राज्य सरकार त्यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते, एवढीच समाधानाची बाब. माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी अपेक्षा चित्रपटरसिक व्यक्त करीत आहेत.चित्रपट रसिकांची अपेक्षाच्कोल्हापूरच्या चित्रनगरीला ‘अनंत माने’ यांचे नाव द्यावे.च्अनंत माने यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवावा.च्शिवाजी विद्यापीठात चित्रपट अभ्यासकांसाठी स्वतंत्र दालन उभारून त्याला अनंत माने यांचे नाव द्यावे.फलकच गायबअनंत माने यांचे नाव लक्ष्मीपुरीतील एका चौकाला दिले होते. तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या नावाचा फलकच आता गायब झाला आहे.