शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मराठी चित्रपटसृष्टीला अनंत माने यांचा विसर

By admin | Updated: March 22, 2015 01:05 IST

तमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे.

संदीप आडनाईक ल्ल कोल्हापूरतमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे. चित्रपटसृष्टीतील ६५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ५७ चित्रपट दिग्दर्शित केले. संकलण, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, प्रसंगी तोंडाला रंग फासून ते मॉबसिनही करायचे. अभिनय असो की कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन किंवा निर्मिती आणि वितरण या सर्व क्षेत्रात त्यांनी कामाचा ठसा उमटवला.मराठी चित्रपटांच्या पडत्या काळात माने यांनी ‘सांगत्ये ऐका’सारखा तमाशाप्रधान चित्रपट बनविला आणि पुण्यात त्याने तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला. अजूनही हा विक्रम मराठी चित्रपटाने मोडलेला नाही. माने यांनी मायभूमी कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती केली. इतकेच नव्हे तर कलाकार, तंत्रज्ञही येथील घेण्याचा अट्टहास धरला. आज जे काही कलावंत त्यांच्यामुळे शिखरावर आहेत, त्यांनाही माने यांचा विसर पडला आहे. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या कलावंतांचा यथोचित सन्मान सरकारदरबारी झाला. मात्र आजची परिस्थिती पालटली आहे. मराठी चित्रपटांना संजिवनी देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करावा, असे आता सरकार दरबारी वाटत नाही. कोल्हापूर चित्रनगरीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या माने यांच्यासारख्या द्रष्ट्या कलावंताची कोल्हापुरात साधी नावनिशाणीही नाही. त्यांच्या नावाने येथे एखादे सभागृहही नाही. कोल्हापुरातील एका रस्त्याला आणि चौकाला महानगरपालिकेने त्यांचे नाव दिले होते, पण आज त्याचा ठावठिकाणा शोधावा लागतो. माने यांनी तमाशाप्रधान चित्रपटांबरोबरच ‘मानिनी’, ‘सुशीला’सारखे सामाजिक आशयाचे लोकनाट्याला सन्मान देणारे चित्रपटही दिले. राज्य सरकार त्यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते, एवढीच समाधानाची बाब. माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी अपेक्षा चित्रपटरसिक व्यक्त करीत आहेत.चित्रपट रसिकांची अपेक्षाच्कोल्हापूरच्या चित्रनगरीला ‘अनंत माने’ यांचे नाव द्यावे.च्अनंत माने यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवावा.च्शिवाजी विद्यापीठात चित्रपट अभ्यासकांसाठी स्वतंत्र दालन उभारून त्याला अनंत माने यांचे नाव द्यावे.फलकच गायबअनंत माने यांचे नाव लक्ष्मीपुरीतील एका चौकाला दिले होते. तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या नावाचा फलकच आता गायब झाला आहे.