शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

मराठी चित्रपटसृष्टीला अनंत माने यांचा विसर

By admin | Updated: March 22, 2015 01:05 IST

तमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे.

संदीप आडनाईक ल्ल कोल्हापूरतमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे. चित्रपटसृष्टीतील ६५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ५७ चित्रपट दिग्दर्शित केले. संकलण, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, प्रसंगी तोंडाला रंग फासून ते मॉबसिनही करायचे. अभिनय असो की कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन किंवा निर्मिती आणि वितरण या सर्व क्षेत्रात त्यांनी कामाचा ठसा उमटवला.मराठी चित्रपटांच्या पडत्या काळात माने यांनी ‘सांगत्ये ऐका’सारखा तमाशाप्रधान चित्रपट बनविला आणि पुण्यात त्याने तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला. अजूनही हा विक्रम मराठी चित्रपटाने मोडलेला नाही. माने यांनी मायभूमी कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती केली. इतकेच नव्हे तर कलाकार, तंत्रज्ञही येथील घेण्याचा अट्टहास धरला. आज जे काही कलावंत त्यांच्यामुळे शिखरावर आहेत, त्यांनाही माने यांचा विसर पडला आहे. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या कलावंतांचा यथोचित सन्मान सरकारदरबारी झाला. मात्र आजची परिस्थिती पालटली आहे. मराठी चित्रपटांना संजिवनी देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करावा, असे आता सरकार दरबारी वाटत नाही. कोल्हापूर चित्रनगरीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या माने यांच्यासारख्या द्रष्ट्या कलावंताची कोल्हापुरात साधी नावनिशाणीही नाही. त्यांच्या नावाने येथे एखादे सभागृहही नाही. कोल्हापुरातील एका रस्त्याला आणि चौकाला महानगरपालिकेने त्यांचे नाव दिले होते, पण आज त्याचा ठावठिकाणा शोधावा लागतो. माने यांनी तमाशाप्रधान चित्रपटांबरोबरच ‘मानिनी’, ‘सुशीला’सारखे सामाजिक आशयाचे लोकनाट्याला सन्मान देणारे चित्रपटही दिले. राज्य सरकार त्यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते, एवढीच समाधानाची बाब. माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी अपेक्षा चित्रपटरसिक व्यक्त करीत आहेत.चित्रपट रसिकांची अपेक्षाच्कोल्हापूरच्या चित्रनगरीला ‘अनंत माने’ यांचे नाव द्यावे.च्अनंत माने यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवावा.च्शिवाजी विद्यापीठात चित्रपट अभ्यासकांसाठी स्वतंत्र दालन उभारून त्याला अनंत माने यांचे नाव द्यावे.फलकच गायबअनंत माने यांचे नाव लक्ष्मीपुरीतील एका चौकाला दिले होते. तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या नावाचा फलकच आता गायब झाला आहे.