शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

भाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर

By admin | Updated: February 7, 2015 00:12 IST

सुप्रिया सुळे : केंद्र, महाराष्ट्रातील शंभर दिवसांचा कार्यक्रमही ‘फेल’

सांगली : भाजपच्या नेत्यांनी, शंभर दिवसात विकासाचा डोंगर उभा करतो, अशी खोटी आश्वासने देऊन केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळविली. निवडणुकीच्या कालावधित शंभर दिवसात महागाई कमी करण्यासह परदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या, टोल हटविण्याच्या घोषणा केल्या होत्या. पण, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगलीत आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली.त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे त्यांनी जनाधाराचा आदर करून दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत. परंतु, सध्या या दोन्ही सरकारचा कारभार पाहिल्यास, त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. महाराष्ट्र सरकारला काम करण्यासाठी जरूर अजून अवधी दिला पाहिजे. त्यांना चांगल्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच मदत करेल. मात्र, शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय होणार असतील, तर रस्त्यावरही उतरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांनी, सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादीचे आमदार भाजप सरकारला जाब विचारतील, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या योजनांचा केंद्राकडून वापरमहाराष्ट्रात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या संपूर्ण स्वच्छता अभियान, इकोव्हिलेज आदी योजना केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार राबवत आहे, हा महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्राकडून या योजना घेताना जशाच्या तशा राबविण्याची गरज होती. परंतु, केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविताना गावांची निवड केली असून त्यासाठी कुठलाही निधी मिळाला नाही. यामुळे कोणतीही ठोस अशी कामे करता येत नाहीत. याबद्दल मोदी यांना पत्रव्यवहार करून कळविले असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.