शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर

By admin | Updated: February 7, 2015 00:12 IST

सुप्रिया सुळे : केंद्र, महाराष्ट्रातील शंभर दिवसांचा कार्यक्रमही ‘फेल’

सांगली : भाजपच्या नेत्यांनी, शंभर दिवसात विकासाचा डोंगर उभा करतो, अशी खोटी आश्वासने देऊन केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळविली. निवडणुकीच्या कालावधित शंभर दिवसात महागाई कमी करण्यासह परदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या, टोल हटविण्याच्या घोषणा केल्या होत्या. पण, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगलीत आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली.त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे त्यांनी जनाधाराचा आदर करून दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत. परंतु, सध्या या दोन्ही सरकारचा कारभार पाहिल्यास, त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. महाराष्ट्र सरकारला काम करण्यासाठी जरूर अजून अवधी दिला पाहिजे. त्यांना चांगल्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच मदत करेल. मात्र, शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय होणार असतील, तर रस्त्यावरही उतरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांनी, सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादीचे आमदार भाजप सरकारला जाब विचारतील, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या योजनांचा केंद्राकडून वापरमहाराष्ट्रात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या संपूर्ण स्वच्छता अभियान, इकोव्हिलेज आदी योजना केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार राबवत आहे, हा महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्राकडून या योजना घेताना जशाच्या तशा राबविण्याची गरज होती. परंतु, केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविताना गावांची निवड केली असून त्यासाठी कुठलाही निधी मिळाला नाही. यामुळे कोणतीही ठोस अशी कामे करता येत नाहीत. याबद्दल मोदी यांना पत्रव्यवहार करून कळविले असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.