शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

भाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर

By admin | Updated: February 7, 2015 00:12 IST

सुप्रिया सुळे : केंद्र, महाराष्ट्रातील शंभर दिवसांचा कार्यक्रमही ‘फेल’

सांगली : भाजपच्या नेत्यांनी, शंभर दिवसात विकासाचा डोंगर उभा करतो, अशी खोटी आश्वासने देऊन केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळविली. निवडणुकीच्या कालावधित शंभर दिवसात महागाई कमी करण्यासह परदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या, टोल हटविण्याच्या घोषणा केल्या होत्या. पण, केंद्र आणि महाराष्ट्र सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगलीत आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली.त्या पुढे म्हणाल्या की, केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे त्यांनी जनाधाराचा आदर करून दिलेली आश्वासने पाळली पाहिजेत. परंतु, सध्या या दोन्ही सरकारचा कारभार पाहिल्यास, त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. महाराष्ट्र सरकारला काम करण्यासाठी जरूर अजून अवधी दिला पाहिजे. त्यांना चांगल्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच मदत करेल. मात्र, शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय होणार असतील, तर रस्त्यावरही उतरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपच्या नेत्यांनी, सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादीचे आमदार भाजप सरकारला जाब विचारतील, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या योजनांचा केंद्राकडून वापरमहाराष्ट्रात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या संपूर्ण स्वच्छता अभियान, इकोव्हिलेज आदी योजना केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार राबवत आहे, हा महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्राकडून या योजना घेताना जशाच्या तशा राबविण्याची गरज होती. परंतु, केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविताना गावांची निवड केली असून त्यासाठी कुठलाही निधी मिळाला नाही. यामुळे कोणतीही ठोस अशी कामे करता येत नाहीत. याबद्दल मोदी यांना पत्रव्यवहार करून कळविले असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.