शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वनसमित्या करणार वनक्षेत्राचे संरक्षण

By admin | Updated: September 4, 2015 22:53 IST

राज्यात १२ हजार संयुक्त वनसंरक्षण समित्या स्थापन.

बुलडाणा : राज्यभरात वनालगत असलेल्या १५ हजार ५00 गावांमध्ये आतापर्यंत एकूण १२ हजार ५६१ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या (वनसंरक्षक) स्थापन करण्यात आल्या आहेत. वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ४५ टक्के वनक्षेत्रात या संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून संरक्षणाची कामे केली जाणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण करून वनांचे व्यवस्थापन व वनविकासाच्या कामांत अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळावा, यासाठी वनालगत राहणार्‍या लोकांना विशेष सवलतीच्या दरात स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी २0१४-१५ मध्ये एकूण १९ कोटी २0 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. या अनुदानातून एकूण २८ हजार ९८५ लोकांना लाभ मिळाला. संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून वनसंरक्षण व संवर्धनाच्या कामात ग्रामस्थांचा अधिकाधिक सहभाग प्राप्त व्हावा आणि समित्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन समित्यांना चांगली कामे करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. उल्लेखनीय काम करणार्‍या वनव्यवस्थापन समित्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

*रोजगार हमी योजनेत यंत्रणा म्हणून मान्यता

          वनक्षेत्रातील वृक्षतोड कमी व्हावी, यासाठी राज्य शासनातर्फे जंगलाशेजारच्या गावांमध्ये एलपीजी गॅस, बायोगॅस व दुभती जनावरे वाटप केली जात आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करुन त्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत यंत्रणा म्हणून मान्यताही देण्यात आली आहे