शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाची ‘कासव बचाव’ मोहीम

By admin | Updated: April 12, 2015 00:59 IST

दापोली वनपरिक्षेत्र उपविभागाने २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीत समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्राच्या माध्यमातून १६ हजार ६५१ अंडी गोळा केली

औषधोपचार : सात हजार पिल्लांना समुद्रात सोडले, कासवांचे संवर्धन व संरक्षण करण्याचा हेतूशिवाजी गोरे ल्ल दापोलीसमुद्रकिनाऱ्यावरील कासवांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने पुढाकार घेतला आहे. दापोली वनपरिक्षेत्र उपविभागाने २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीत समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्राच्या माध्यमातून १६ हजार ६५१ अंडी गोळा केली असून, त्यातून बाहेर पडलेल्या ७ हजार ७ पिल्लांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडले आहे.निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक असलेले हे कासव अलीकडे मात्र दुष्टचक्रात अडकले आहे. कासवांच्या तस्करीचे प्रमाण काही वर्षांत वाढले आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगमुळे कासवांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेत कोकण किनारपट्टीवरील कासवांचे संवर्धन करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. वनविभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्र उभे केले आहे.या मोहिमेला यशसुद्धा येऊ लागले आहे. पाच वर्षा$ंपूर्वी आंजर्ले व वेळास ही दोन संवर्धन केंद्रे होती. किनारपट्टीवरील ग्रामस्थांची मागणी वाढल्याने ही संख्या आता ९ झाली आहे. २००२ ते २०१०पर्यंत चिपळुणातील भाऊ काटदरे यांची सह्याद्री निसर्गमित्र व वनविभाग यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत होता. २०११पासून वनविभागाने ही मोहीम पूर्णपणे हाती घेतली आहे. समुद्रकिनारपट्टीवरील कासवाची अंडी शोधून एकत्र करून संवर्धन केंद्रातील घरट्यात ठेवली जातात. चार वर्षांत १६,६५१ अंडी सापडली. त्यापैकी ७००७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.किनारपट्टीवरील कासव संवर्धन केंद्रामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली असून, अनेक कासवांचे संवर्धन होत आहे. यापुढे ही मोहीम अधिक गतिमान केली जाईल. स्थानिकांचा सकारात्मक सहभाग असल्यामुळेच ही मोहीम यशस्वी होतेय.- राजेंद्र पत्की, वनपरिक्षेत्र अधिकारीकासव संवर्धन व संरक्षण केंद्राचे काम केल्याने महिना ८ हजार रुपये मिळतात. सकाळी, संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारून अंडी गोळा करून संवर्धन केंद्रात ठेवतो.- अभिजित केळस्कर, आंजर्लेजन्माच्या ठिकाणीच घालतात अंडीकासवांचा अधिवास असलेल्या किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी येत असल्याचे आढळले आहे. ज्या किनारपट्टीवरील घरट्यातून पिल्ले बाहेर पडली तेथे ते पिल्लू मोठेपणी अंडी घालण्यासाठी येत असल्याचा शोधही लागला आहे. दरवर्षी किंवा २ वर्षांतून एकदा किंवा ३ वर्षांतून दोनदा कासव अंडी घालते. भरती रेषेच्या बाहेर वाळूत खोलवर अंडी घातली जातात. त्यावर पुन्हा वाळू टाकून तो खड्डा बुजवून कासव समुद्रात निघून जाते.कोकणातील पहिलेकेंद्र वेळासला सन २००२पासून २०१४पर्यंत १० हजार कासवांच्या पिल्लांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडणारे वेळास हे राज्यातील पहिले गाव आहे. वेळास किनाऱ्यावर २००२ साली सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने कोकणातील पहिले कासव संवर्धन व संरक्षण केंद्र उभारले. च्पावसाळ्यात किनाऱ्यावर येणाऱ्या जखमी कासवांवर उपचार करून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी वनविभागाने वेळास व आंजर्ले किनारी हौद बांधले आहेत. जून ते सप्टेंबर या काळात जाळीत अडकून किंवा लाटांनी खडकावर आदळून जखमी कासव किनाऱ्यावर येऊन उपचाराअभावी मरून पडतात. आता मात्र जखमी कासवांवर उपचार होतील.