शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

भूविकास बँकांना कायमचे टाळे

By admin | Updated: May 13, 2015 02:17 IST

एकेकाळी राज्याच्या कृषी व ग्रामीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भूविकास बँकांची अखेरची घरघर थांबवत त्या अवसायनात काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचा

मुंबई : एकेकाळी राज्याच्या कृषी व ग्रामीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भूविकास बँकांची अखेरची घरघर थांबवत त्या अवसायनात काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक म्हणजेच भूविकास बँकेचे पुनरुज्जीवन करणे शक्य नसल्याची भूमिका मंत्रिमंडळाने घेतली. शिखर भूूविकास बँक आणि जिल्हा भूविकास बँकांच्या अवसायनाबाबत शासनाने सुरू केलेली कार्यवाही उच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून चालू ठेवण्यात येणार आहे. या बँकेच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्यासाठी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने उपसमिती नेमली होती. या समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाने आज स्वीकारल्या. बँकेच्या ६० मालमत्तांचे अंदाजे मूल्यांकन ५५५ कोटी रुपये असून, बँकेकडून शासनास येणे असलेल्या रकमेपोटी या मालमत्ता शासनास हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या बँकांच्या अवसायनाची प्रक्रिया आघाडी सरकारने सुरू केली. त्याविरुद्ध शिखर बँक आणि १७ जिल्हा भूविकास बँकांनी उच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळविली. आज उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून अवसायनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे राज्य मंत्रिमंडळाने ठरविले. (विशेष प्रतिनिधी)