शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

विदेशी बहू साफ करते समुद्रकिनारा

By admin | Updated: April 24, 2017 23:47 IST

वसई तालुक्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, पर्यटकांनी किनारे अस्वच्छ केले आहेत. मात्र, वसईची एक परदेशी सून मात्र गेल्या महिनाभरापासून

शशी करपे / वसईवसई तालुक्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, पर्यटकांनी किनारे अस्वच्छ केले आहेत. मात्र, वसईची एक परदेशी सून मात्र गेल्या महिनाभरापासून पती आणि छोट्या मुलीसोबत दर रविवारी रानगावच्या समुद्रकिनाऱ्यावरील कचरा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावीत आहे. परदेशी सुनेने वसईकरांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे. हंगेरीच्या सुझसान्ना यांचा पाच वर्षांपूर्वी वसईतील लिस्बन फेराओ यांच्याशी प्रेमविवाह झाला. त्या वसईत स्थायिक झाल्या आहेत. त्यांना मुलगी आहे. सुझसान्ना फेराओ यांना समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याची आवड होती पण हंगेरीत समुद्र नसल्याने त्यांना वसईत आल्यावर ती हौस भागवता आली आहे. वसईतील सुंदर किनाऱ्यांनी त्यांना आकर्षित केले आहे. त्या आपले पती आणि मुलीसोबत रानगाव समुद्रकिनारी दर रविवारी फिरायला येतात. मात्र, येणाऱ्या पर्यटकांनी किनारे अस्वच्छ केले आहेत. ठिकठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या. प्लॅस्टिकचा कचरा यासह विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढीग किनाऱ्यावर पडलेले दिसतात. अस्वच्छ किनाऱ्यांमुळे फिरण्याची मजा लुटता येत नसल्याने यांनी समुद्रकिनाऱ्यावर असलेला कचरा पिशवीत गोळा करून योग्य त्याठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार सुचला. तसे त्यांनी लिस्बन यांना बोलून दाखवले. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुझसान्ना आणि लिस्बन रानगाव किनाऱ्यावर असलेला कचरा पिशवीत गोळा करून नेत आहेत. किनारा स्वच्छतेत त्यांची चिमुकलीदेखिल त्यांना मदत करीत असते. एक परदेशी महिला आपल्या चिमुकलीसह किनाऱ्यावर पडलेला कचरा गोळा करताना पाहून पर्यटक आणि स्थानिकांनाही कुतुहल वाटू लागले आहे. त्यांच्या स्वच्छता मोहिमेत कधी तरी स्थानिकांचे दोन चार हात मदतीला येत असतात. आपण ज्याठिकाणी मुलांसोबत खेळतो, बागडतो, मौज मस्ती करतो तो परिसर स्वच्छ असावा असे त्यांना वाटते. निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छता राखली पाहिजे असेही त्या सांगतात. स्वच्छतेत आपण खारीचा वाटा उचलत आहोत. पर्यटकांनी स्वच्छता करावी असे म्हणणे नाही. पण, किमान किनाऱ्यावर कचरा टाकू नये अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. फिरण्यासोबत आपण किनाऱ्यावरील कचरा उचलत राहणार असेही त्या सांगतात. त्यांच्या स्वच्छतेचा धडा वसईकर आणि पर्यटक नक्कीच गिरवून वसई तालुक्यातील समुद्रकिनारे सुंदर आणि स्वच्छ ठेवतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.