शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

विदेशी बहू साफ करते समुद्रकिनारा

By admin | Updated: April 24, 2017 23:47 IST

वसई तालुक्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, पर्यटकांनी किनारे अस्वच्छ केले आहेत. मात्र, वसईची एक परदेशी सून मात्र गेल्या महिनाभरापासून

शशी करपे / वसईवसई तालुक्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, पर्यटकांनी किनारे अस्वच्छ केले आहेत. मात्र, वसईची एक परदेशी सून मात्र गेल्या महिनाभरापासून पती आणि छोट्या मुलीसोबत दर रविवारी रानगावच्या समुद्रकिनाऱ्यावरील कचरा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावीत आहे. परदेशी सुनेने वसईकरांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे. हंगेरीच्या सुझसान्ना यांचा पाच वर्षांपूर्वी वसईतील लिस्बन फेराओ यांच्याशी प्रेमविवाह झाला. त्या वसईत स्थायिक झाल्या आहेत. त्यांना मुलगी आहे. सुझसान्ना फेराओ यांना समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याची आवड होती पण हंगेरीत समुद्र नसल्याने त्यांना वसईत आल्यावर ती हौस भागवता आली आहे. वसईतील सुंदर किनाऱ्यांनी त्यांना आकर्षित केले आहे. त्या आपले पती आणि मुलीसोबत रानगाव समुद्रकिनारी दर रविवारी फिरायला येतात. मात्र, येणाऱ्या पर्यटकांनी किनारे अस्वच्छ केले आहेत. ठिकठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या. प्लॅस्टिकचा कचरा यासह विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढीग किनाऱ्यावर पडलेले दिसतात. अस्वच्छ किनाऱ्यांमुळे फिरण्याची मजा लुटता येत नसल्याने यांनी समुद्रकिनाऱ्यावर असलेला कचरा पिशवीत गोळा करून योग्य त्याठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार सुचला. तसे त्यांनी लिस्बन यांना बोलून दाखवले. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुझसान्ना आणि लिस्बन रानगाव किनाऱ्यावर असलेला कचरा पिशवीत गोळा करून नेत आहेत. किनारा स्वच्छतेत त्यांची चिमुकलीदेखिल त्यांना मदत करीत असते. एक परदेशी महिला आपल्या चिमुकलीसह किनाऱ्यावर पडलेला कचरा गोळा करताना पाहून पर्यटक आणि स्थानिकांनाही कुतुहल वाटू लागले आहे. त्यांच्या स्वच्छता मोहिमेत कधी तरी स्थानिकांचे दोन चार हात मदतीला येत असतात. आपण ज्याठिकाणी मुलांसोबत खेळतो, बागडतो, मौज मस्ती करतो तो परिसर स्वच्छ असावा असे त्यांना वाटते. निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छता राखली पाहिजे असेही त्या सांगतात. स्वच्छतेत आपण खारीचा वाटा उचलत आहोत. पर्यटकांनी स्वच्छता करावी असे म्हणणे नाही. पण, किमान किनाऱ्यावर कचरा टाकू नये अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. फिरण्यासोबत आपण किनाऱ्यावरील कचरा उचलत राहणार असेही त्या सांगतात. त्यांच्या स्वच्छतेचा धडा वसईकर आणि पर्यटक नक्कीच गिरवून वसई तालुक्यातील समुद्रकिनारे सुंदर आणि स्वच्छ ठेवतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.