शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

सक्तीची करवसुली!

By admin | Updated: March 2, 2017 05:53 IST

पाणीपट्टीची नागरिकांकडून वसुुली करण्यासाठी एक महिन्याची जोरदार मोहीम उघडण्याचे फर्मान राज्याच्या नगरविकास विभागाने बुधवारी काढले.

यदु जोशी,मुंबई- राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका संपून सगळीकडे कमळ फुलताच सर्व महापालिकांमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची नागरिकांकडून वसुुली करण्यासाठी एक महिन्याची जोरदार मोहीम उघडण्याचे फर्मान राज्याच्या नगरविकास विभागाने बुधवारी काढले. नगरविकास विभाग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. जे कर भरण्यात सतत टाळाटाळ करतात, अशा करबुडव्यांविरुद्ध कायद्यानुसार दंडनीय कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने विविध विभागांना की रिझल्ट एरिया (केआरए) अंतर्गत काही उद्दिष्ट्ये दिलेली आहेत. >सर्व महापालिकांना वसुलीचा दंडकमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशात सर्व महापालिकांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली केली पाहिजे, असा दंडक घालून दिला आहे. या उद्दिष्टाची पूर्तता करणे हे प्रत्येक महापालिका आयुक्तांवर बंधनकारक आहे. त्याचा उल्लेख आदेशामध्ये करीत, नगरविकास विभागाने ३१ मार्चपर्यंत करांची विशेष वसुली मोहीम राबविण्यास सांगितले आहे. सर्व महापालिकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या १०० टक्के वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले असून त्यासाठीचा कार्यक्रम देण्यात आला.>आर्थिक अडचण टाळण्यासाठी..!स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आल्यानंतर महापालिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्व महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वत:हूनच महापालिकांना हे आदेश दिल्यामुळे पालिकांच्या उत्पन्नात आपोआप वाढेल आणि राज्य सरकारवरील भार काहीसा कमी होईल. अर्थात नोटाबंदीनंतर अनेक नागरिकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टीचा जुन्या नोटांद्वारे भरणा केला होता.>...अन्यथा तरतुदीनुसार दंडनीय कारवाई करावीसर्वसाधारणपणे २० टक्के नागरिकांकडे एकूण थकबाकीपैकी ८० टक्के रक्कम प्रलंबित असते. ३० टक्के नागरिक/संस्था या बड्या थकबाकीदार असतात. त्यांच्याकडून वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. 30% व्यक्ती वा संस्थांनी करभरणा केला नाही तर महाराष्ट्र महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार दंडनीय कारवाई करावी, असे नगरविकास विभागाने आदेशात म्हटले आहे. नागरिकांप्रमाणेच शासकीय, निमशासकीय कार्यालयांकडून वसुलीची मोहीमही राबविली जाणार आहे.