शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच्या दराने शेतक-यांना अन्नधान्याचा पुरवठा!

By admin | Updated: August 10, 2015 01:01 IST

अंमलबजावणीसाठी तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार लागले कामाला.

साहेबराव राठोड / मंगरूळपीर (वाशिम) : राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यापृष्ठभूमीवर मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यातील गोरगरीब शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जारी केले होते. या आदेशाची आता अंमलबजावणी सुरू झाली असून, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी लाभार्थींचा शोध घेत आहेत. राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी कुटुंबाला सार्वजनिक वितरण प्रणालीतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर स्वस्तातील अन्नधान्य देता येईल काय, यावर शासनस्तरावर मंथन होऊन, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गोरगरीब शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर अन्नधान्य पुरवठा करण्याचे आदेश शासनाने जारी करण्यात आले. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या १४ जिल्हय़ातील शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्न धान्याचा पुरवठा केला जाणार आहे. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून, गावपातळीवर तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार यांना जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदारांनी बैठक घेतली असून, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. एपीएल (केशरी) मधील लाभार्थींच्या यादीतील शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ज्या दराने व परिमाणात अन्नधान्याचा लाभ दिला जातो, त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्याचा लाभ या शेतकर्‍यांना दिला जाणार आहे. एपीएलमधील शेतकर्‍यांना तांदुळ प्रति किलो ३ रूपये व गहु २ रूपये प्रतिकिलो या दराने दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना सातबारा, कुटुंब प्रमुखाचे शेतीवर अवलंबून असल्याबाबतचे घोषणापत्र गावातील स्वस्त धान्य दुकानदाराकडे सादर करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाने वाशिम जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांना सूचना दिल्या असून अल्पावधीत याची कारवाई पूर्ण केली जावी, असे स्पष्ट केले आहे.