शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

२२ मजुरांना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 19:27 IST

जिगाव प्रकल्प येथे काम करणा-या २२ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. बाधीत रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले

ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 16 - जिगाव प्रकल्प येथे काम करणा-या २२ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. बाधीत रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पावर परप्रांतीय मजुर कामासाठी आले आहेत. कामावरील मजुरांना दररोज मेसचे जेवण देण्यात येते. रविवारी सकाळी मजुरांनी जेवण केल्यानंतर त्यांना मळमळ होणे. पोट दुखणे, अंग खाजवणे, ताप आदी त्रास सुरु झाले. सुमारे २२ मजुरांना एकाचवेळी त्रास सुरु झाल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने सर्व मजुरांना स्थानिक सामान्य रुग्णालयात दुपारच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करुन त्यांना दाखल केले. रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दाखल करण्यात आलेल्या रुग्णामध्ये मो.एजाज.मो.आलेम (वय २८), राजेशसिंह रामराजन (वय १७), निलेश श्रीकामता प्रसाद (वय १२), महेश इमामसिंग मोहरे (वय २०), सोनू प्रल्हाद साकेत (वय २४), अताहुसैन (वय २२), हरिप्रसाद श्रीराम कसब (वय १९), बेलाम अहमद (वय २३), दिलशाद महमंद (वय २०), दादुसिंग दिलराजसिंग (वय २५), रामचंद्र रामरतन यादव (वय १९), अशोकपाल श्रीपाद (वय २३) सत्येंद्र लालूप्रसाद (वय २५), जितेंद्र राम (वय २०), दुलम बहरीया (वय २०), रामु मोहीम रामविलास (वय १८), महेंद्रसिंग बहादुरीया (वय २३), जलालुद्दीन रहेमोद्दीन (वय १८), कैसरअली नवाजोद्दीन (वय १९), हे सर्व रा.जि.सिंगरोली मध्यप्रदेश तर उदय सुरेश गुडपल्ली (वय २१) अजय आनजी नायडू (वय २२) रा.मध्यप्रदेश यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
 
बोअरचे पाणी पिल्यामुळे त्रासाची शक्यता-
जिगाव प्रकल्पावर चारशेच्या जवळपास मजुर कामावर आहेत. राज्यातील मजुराबरोबर येथे मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील मजुरांचाही समावेश आहे. या मजुरांना जेवणासाठी मेसची व्यवस्था केलेली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बोअरमधील पाण्याचा वापर केल्या जातो. नवीन बोअरचे पाणी पिल्यामुळे पोटात त्रास वाढल्याचे  बाधीत रुग्णांनी सांगितले. मजुरांसाठी पिण्याचे पाणी बोअरमधून टँकरमध्ये तर टँकरमधून पाण्याच्या टाक्यात टाकले जाते. बोअरच्या पाण्याची योग्य फिल्टर न झाल्यामुळे मजुरांना त्रास वाढल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर-
जेवण झाल्यानंतर अन्नातून विषबाधा तसेच बोअरचे पाणी पिल्याने मजुरांना त्रास वाढला. त्यांना तात्काळ स्थानिक सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन उपचार सुरु केले आहेत. सर्व मजुरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.