शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

अन्नधान्यात घट, ऊसक्षेत्रात वाढ !

By admin | Updated: March 18, 2016 04:03 IST

भीषण दुष्काळ, अकाली पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात यंदा २४.९ टक्के घट झाली असून कापूस, तेलबिया, फळांच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे.

मुंबई : भीषण दुष्काळ, अकाली पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात यंदा २४.९ टक्के घट झाली असून कापूस, तेलबिया, फळांच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे. मात्र, एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे सर्वाधिक पाणी लागणाऱ्या उसाचे क्षेत्र तब्बल १९ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याच्या कृषी विकासाचा दर आगामी वर्षात २.७ टक्क्यांनी घसरेल, अशी चिंता महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. २०१५-१६ च्या वार्षिक आर्थिक पाहणीचा अहवाल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. उद्योग क्षेत्राच्या मूल्यवृद्धीत ५.९ टक्के तर सेवा क्षेत्रात १०.८ टक्के वाढ झाली असताना कृषी व संलग्न क्षेत्राच्या स्थूल मूल्यवृद्धीत पुढील वर्षी २.७ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. कृषी उत्पादन घटल्याने पडलेला खड्डा उद्योग, सेवा क्षेत्राने भरून काढल्याचे दिसते. राज्याचा विकास ५.८ टक्क्यांवरून ८ टक्के इतका झाला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही विकासाचा दर वाढला हे सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे फलित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रातील मूल्यवृद्धीचा दर ५.९ टक्के इतका असल्याचे आर्थिक पाहणीत म्हटले आहे. तृणधान्ये व कडधान्यांच्या उत्पादनात अनुक्रमे १८.७ टक्के व ४७ टक्के घट झाली. कापूस व तेलबिया आणि फळभाज्यांचे उत्पादन अनुक्रमे ५९.५ टक्के, ५२.८ टक्के आणि १५ टक्के इतके घटले. सलग दुसऱ्या वर्षी राज्याचा कृषी दर कमालीचा घटला आहे.दूध व्यवसाय संकटातकृषी क्षेत्राशी निगडित दूध व्यवसायदेखील कमालीचा संकटात आल्याचे सर्वेक्षणावरून स्पष्ट होते. ४३ टक्के सहकारी दूध संस्था आणि ५१ टक्के दूध संघ तोट्यात आहेत. एकूण २४ टक्के सहकारी संस्था तोट्यात असून त्यातील २२ टक्के संस्था कृषी पतपुरवठा करणाऱ्या आहेत.