शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

अन्नधान्यात घट, ऊसक्षेत्रात वाढ !

By admin | Updated: March 18, 2016 04:03 IST

भीषण दुष्काळ, अकाली पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात यंदा २४.९ टक्के घट झाली असून कापूस, तेलबिया, फळांच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे.

मुंबई : भीषण दुष्काळ, अकाली पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात यंदा २४.९ टक्के घट झाली असून कापूस, तेलबिया, फळांच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे. मात्र, एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे सर्वाधिक पाणी लागणाऱ्या उसाचे क्षेत्र तब्बल १९ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याच्या कृषी विकासाचा दर आगामी वर्षात २.७ टक्क्यांनी घसरेल, अशी चिंता महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. २०१५-१६ च्या वार्षिक आर्थिक पाहणीचा अहवाल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. उद्योग क्षेत्राच्या मूल्यवृद्धीत ५.९ टक्के तर सेवा क्षेत्रात १०.८ टक्के वाढ झाली असताना कृषी व संलग्न क्षेत्राच्या स्थूल मूल्यवृद्धीत पुढील वर्षी २.७ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. कृषी उत्पादन घटल्याने पडलेला खड्डा उद्योग, सेवा क्षेत्राने भरून काढल्याचे दिसते. राज्याचा विकास ५.८ टक्क्यांवरून ८ टक्के इतका झाला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही विकासाचा दर वाढला हे सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे फलित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रातील मूल्यवृद्धीचा दर ५.९ टक्के इतका असल्याचे आर्थिक पाहणीत म्हटले आहे. तृणधान्ये व कडधान्यांच्या उत्पादनात अनुक्रमे १८.७ टक्के व ४७ टक्के घट झाली. कापूस व तेलबिया आणि फळभाज्यांचे उत्पादन अनुक्रमे ५९.५ टक्के, ५२.८ टक्के आणि १५ टक्के इतके घटले. सलग दुसऱ्या वर्षी राज्याचा कृषी दर कमालीचा घटला आहे.दूध व्यवसाय संकटातकृषी क्षेत्राशी निगडित दूध व्यवसायदेखील कमालीचा संकटात आल्याचे सर्वेक्षणावरून स्पष्ट होते. ४३ टक्के सहकारी दूध संस्था आणि ५१ टक्के दूध संघ तोट्यात आहेत. एकूण २४ टक्के सहकारी संस्था तोट्यात असून त्यातील २२ टक्के संस्था कृषी पतपुरवठा करणाऱ्या आहेत.