शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या घरांसाठी पाठपुरावा करणार- सतीश माथुर

By admin | Updated: August 29, 2016 23:44 IST

पोलिसांना लवकरात लवकर घरं मिळावी, यासाठीही मी पाठपुरावा करणार

डिप्पी वांकाणी/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच कार्यभार स्वीकारला आहे. लोकमतच्या प्रतिनिधीनं या निमित्तानं त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. सतीश माथुर यांनी अनेक मुद्द्यांवर स्वतःची रोखठोक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, मला 2.5 लाख पोलिसांचं नियोजन करावं लागते. इसिसचं राज्यासमोर मोठं आव्हान असताना सायबर क्राइमही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पोलिसांना लवकरात लवकर घरं मिळावी, यासाठीही मी पाठपुरावा करणार आहे, असं पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी सांगितलं आहे.

पोलिसांची जनमानसात असलेली चुकीची प्रतिमा सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. अनेकदा सामान्य लोक एखादा गुन्हा झाल्यावरही पोलीस स्टेशनला जाणं टाळतात. मात्र पोलीस स्टेशन हे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी असतं, हे लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. लोकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न करणार आहे. सण, उत्सवात पोलीस सुट्ट्या न घेता ठरलेल्या कामांच्या तासांहून अधिक वेळ काम करतात. अनेक पोलिसांच्या त्या काळात सुट्ट्याही रद्द होतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पोलिसांच्या सातत्यानं सुट्ट्या रद्द होत आल्या आहेत. पोलीस खात्यात पोलिसांची संख्याही कमी आहे. पोलिसांचा सामाजिक स्तर सुधारण्यासाठी पोलिसांसाठी असलेल्या गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचीही सरकारकडे मागणी करणार आहे.

सरकारनं पोलिसांना उदारमतवादीपणानं घरांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. उदा. गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांच्या घरांसाठी आलेल्या 500 अर्जांपैकी 250 अर्ज अर्थसंकल्पात पोलिसांसाठी असलेल्या निधीचा अभाव असल्यानं रद्द करण्यात आले होते. त्या धोरणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रधानमंत्री गृह आवास योजनेसाठी पात्र असले पाहिजेत. त्याप्रमाणेच त्यांना दरवर्षी घरखरेदीसाठी 6 टक्क्यांपर्यंत कर्ज दिलं पाहिजे. याबाबत जागरूकता पसरवण्याची गरज असून, पोलिसांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देणं गरजेचं आहे.

आर्थिक आणि सायबर गुन्हे यात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे तपास करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं गुन्हाचा छडा कशा प्रकारे लावता येईल, याचंही प्रशिक्षण पोलिसांना मिळावं, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पोलीस गुन्हेगाराला शोधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून चांगलं शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा मिळणं गरजेचं आहे. पोलीस अतिशय जोखमीचं काम करत असून, सरकारच्या इतर खात्यांशीही समन्वय साधतात.

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या उपद्रवही देशभरात वाढत आहे. मात्र ही नक्षलवादी प्रवृत्ती संपवण्याची गरज आहे. पोलीसही नक्षलवाद्यांशी लढताना अनेकदा जोखीम पत्करतात. सी-60 कमांडो आणि सीआरपीएफचे जवानांनी नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी अनेकदा ऑपरेशन राबवली आहेत आणि ती यशस्वी करून दाखवली आहेत. पवन हंस सारखे चॉपर आपल्याकडे आधीपासून उपलब्ध आहेत. तशाच प्रकारे आणखी हेलिकॉप्टर खरेदी करण्याची गरज आहे. इसिसच्या वाढत्या प्रभावावरही सतीश माथुर यांनी चिंता व्यक्त केली असून, दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.