शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

चारा छावणी घोटाळा: महाराष्ट्रातील 'लालू' मोकाट !

By admin | Updated: July 13, 2016 15:47 IST

राज्यात २०१३ साली दुष्काळात जनावरांसाठी शासनाने उघडलेल्या चारा छावण्यामध्ये पाच जिल्ह्यात ३०० कोटींचा घोटाळा उघड झाला होता.

शिवाजी सुरवसे/ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. 13 - राज्यात २०१३ साली दुष्काळात जनावरांसाठी शासनाने उघडलेल्या चारा छावण्यामध्ये पाच जिल्ह्यात ३०० कोटींचा घोटाळा उघड झाला होता. जनहित याचिका दाखल झाली़चौकशी झाली़ काही चारा छावणी चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. मात्र या चाराछावणी चालकांमध्ये आमदार, कारखानदार आणि बडे नेते असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी करण्याची टाळाटाळ केली जात आहे. एकीकडे बिहारमध्ये चारा घोटाळ्यात अडकलेले लालू प्रसाद यादव यांना शिक्षा झाली असताना महाराष्ट्रातील लालू मोकाट आहेत. त्यावेळी विरोधात आवाज उठविणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते का गप्पा आहेत असा सवाल जनहित याचिकाकर्ते गोरख घाडगे (सांगोला) यांनी केली आहे.२०१३ साली राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यात शासनामार्फत चारा छावण्या सुरू केल्या होत्या. कारखानदार आणि राजकारणी व्यक्तींनी या छावण्या चालविण्यासाठी घेतल्या होत्या. तहसीलदार आणि त्या संस्थेबरोबर करार करुन चारा छावणीचालकांना नियम व अटी घालून दिल्या होत्या. मात्र या अटींचा भंग करुन शासनाच्या निधीत मोठा घोटाळा करण्यात आला़ जून २०१३ साली राज्यात तब्बल १२७३ चारा छावण्या होत्या. जनावरांची संख्या बोगस दाखविणे, सीसीटीव्ही न बसविणे, जनावरांना बारकोडिंग न करणे, व्हिडीओ चित्रीकरण न करणे, पुरेशा पाण्याची व्यवस्था न करणे, चारा व पशुखाद्य रेकॉर्ड अद्यावत न ठेवणे, कुंपण तसेच गव्हाणीची सुविधा न देणे, जनावरांचा सावलीची व्यवस्था न देता चारा छावणीधारकांना शासनाचा निधीवर डल्ला मारला़ दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य व्यक्तींची लूट केली़. या चारा छावण्यावर दोन हजार कोटींहून अधिक खर्च शासनाचा झाला आहे़ एकट्या सांगोला तालुक्यात १०५ छावण्या होत्या यावरच ३०० कोटी खर्च झाले होते. विभागीय आयुक्तांची चारा छावण्याची तपासणी केल्यावर चालकांना १९ कोटींचा दंड करण्यात आला होता. राज्यभरातील छावणी चालकांना १६७ कोटी दंड करण्यात आला होता. काही छावणी चालकांनी हा दंड देखील भरला नाही़. सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यात अनियमितता आढळल्याने १९ कोटी ७९ लाख रक्कम संबंधित छावणी चालकाच्या बिलातून कपात केली आणि पाच छावण्या बंद केल्या होत्या़ सांगली जिल्ह्यातील १६२ छावण्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ९ कोटी ८७ हजार वसूल केले तर तीन छावण्या बंद केल्या होत्या़ सातारा जिल्ह्यातील छावणी चालकांकडून ५ कोटी १४ वसूल केले होते़ बीड जिल्ह्यातील चारा छावणी चालकांकडून ८़१६ कोटी वसूल केले आहेत़जनहित याचिका क्रमांक १६४/२०१३ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असताना शासनाकडून फौजदारीबाबत टाळाटाळ केली जात आहे़ सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचारी छावणी चालक पांडूरंग नलावडे यांच्याविरोधात फौजदारी दाखल झाली आता त्याच धर्तीवर पाचही जिल्ह्यातील भ्रष्ट छावणी चालकांवर फौजदारी करण्याची कारवाई करावी अशी मागणी घाडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.तेव्हा विरोधात आता सत्तेत !चारा छावण्या घोटाळ्यामध्ये अडकलेल्या छावणी चालकांना दंडात्मक कारवाई करा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी २०१३ साली लक्षवेधी सूचनेद्वारे विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रामनाथ मोते, अ‍ॅड़ आशिष शेलार यांनी विधान परिषदेत यांनी मांडली होती़ यावर मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी उत्तर दिले होते. चौकशी करुन काही जणांनाकडून दंडात्मक वसुलीची कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. घोटाळा झाल्याची कबुली त्यांनी दिली होती मात्र आता कारवाईबाबत शासन, प्रशासनातील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत़ न्यायालयात देखील तारखावर तारखा पडत असून आजवर ३६ तारखाड पडल्या आहेत़ त्यावेळी विरोधात ओरडणाऱ्यांच्या हातात आता सत्ता आहे त्यामुळे त्यांनी तरी या घोटाळेबाज चारा छावणीचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

चारा छावण्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारणाऱ्या चारा छावणीचालकांमध्ये आमदार, खासदार, कारखानदार आहेत म्हणूनच मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस करीत नाहीत. २०१३ मध्ये भाजपमधील आमदारांनी चारा छावणी घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी करण्याची जोरदार मागणी केली होती़मी जनहित याचिका देखील दाखल केली़ न्यायालयाने आदेश दिले मात्र वारंवार शासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे.