शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

गरज असेपर्यंत चारा छावण्या सुरु रहातील - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: March 4, 2016 18:01 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची शुक्रवारी माहिती दिली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची शुक्रवारी माहिती दिली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच चारा छावण्यास ऑक्टोंबर महिन्यात सुरु झाल्या आणि शेतक-यांना गरज असेपर्यंत त्या सुरु रहातील असे सांगितले. 
 
दोन वर्षात आम्ही शेतक-यांसाठी १८ हजार कोटींची तरतूद केली. मागच्या पंधरावर्षात शेतक-यांसाठी फक्त आठ हजार कोटींची तरतूद झाली होती असे फडणवीस यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये पाण्याची गरज आहे त्या गावांमध्ये सरकार टॅंकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करत आहे असे फडणवीस यांनी सांगितले. 
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. आम्ही ४० कोटी रुपयांचे शिक्षण शुल्क माफ केले ज्याचा १० लाख विद्यार्थ्यांना फायदा झाला असे फडणवीस यांनी सांगितले. शेतक-यांना मोठया प्रमाणावर आर्थिक मदत केल्यानंतर शेतक-यांना शेत तळी देण्याची योजना सरकारने आणली आहे. 
 
मनरेगाच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाईल. तीन दिवसात २४ हजार शेतक-यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच ज्या शेतक-यांनी पीकविमा घेतलेला नाही, त्यांनापण मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून बाधित शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.