शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

गरज असेपर्यंत चारा छावण्या सुरु रहातील - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: March 4, 2016 18:01 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची शुक्रवारी माहिती दिली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची शुक्रवारी माहिती दिली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच चारा छावण्यास ऑक्टोंबर महिन्यात सुरु झाल्या आणि शेतक-यांना गरज असेपर्यंत त्या सुरु रहातील असे सांगितले. 
 
दोन वर्षात आम्ही शेतक-यांसाठी १८ हजार कोटींची तरतूद केली. मागच्या पंधरावर्षात शेतक-यांसाठी फक्त आठ हजार कोटींची तरतूद झाली होती असे फडणवीस यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये पाण्याची गरज आहे त्या गावांमध्ये सरकार टॅंकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करत आहे असे फडणवीस यांनी सांगितले. 
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. आम्ही ४० कोटी रुपयांचे शिक्षण शुल्क माफ केले ज्याचा १० लाख विद्यार्थ्यांना फायदा झाला असे फडणवीस यांनी सांगितले. शेतक-यांना मोठया प्रमाणावर आर्थिक मदत केल्यानंतर शेतक-यांना शेत तळी देण्याची योजना सरकारने आणली आहे. 
 
मनरेगाच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाईल. तीन दिवसात २४ हजार शेतक-यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच ज्या शेतक-यांनी पीकविमा घेतलेला नाही, त्यांनापण मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून बाधित शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.