शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

जिल्ह्यात सेंद्रिय शेती करण्यावर भर

By admin | Updated: July 2, 2016 03:24 IST

सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी सुरुवातीला एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे.

अलिबाग : सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी सुरुवातीला एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात त्यामध्ये वाढ करून संपूर्ण जिल्हा सेंद्रियमय करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी दिली.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेतर्फे ३४ शेतकऱ्यांना कृषिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सपत्निक शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी म्हात्रे बोलत होते.सिक्कीम राज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा नेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय खताच्या माध्यमातून शेती करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हळद लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ६०० हेक्टरवर हळदीचे पीक घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.रायगड किल्ल्यावर जिल्हा परिषदेच्या जागेवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी तेथे गार्डन उभारण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समितीकडे सुमारे सहा लाख रुपये वर्ग करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाऊस समाधानकारक सुरू झाल्याने जिल्ह्यात शेतीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. यावेळी साप, विंचूदंश वाढण्याचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी साप, विंचूदंशावरील लसीचा पुरेसा साठा दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेळीपालन व्यवसायातून मोठ्या संख्येने उत्पन्न प्राप्त होते. तसेच अनुदानही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.