शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जिल्ह्यात सेंद्रिय शेती करण्यावर भर

By admin | Updated: July 2, 2016 03:24 IST

सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी सुरुवातीला एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे.

अलिबाग : सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी सुरुवातीला एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात त्यामध्ये वाढ करून संपूर्ण जिल्हा सेंद्रियमय करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी दिली.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेतर्फे ३४ शेतकऱ्यांना कृषिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सपत्निक शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी म्हात्रे बोलत होते.सिक्कीम राज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा नेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय खताच्या माध्यमातून शेती करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हळद लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ६०० हेक्टरवर हळदीचे पीक घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.रायगड किल्ल्यावर जिल्हा परिषदेच्या जागेवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी तेथे गार्डन उभारण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समितीकडे सुमारे सहा लाख रुपये वर्ग करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाऊस समाधानकारक सुरू झाल्याने जिल्ह्यात शेतीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. यावेळी साप, विंचूदंश वाढण्याचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी साप, विंचूदंशावरील लसीचा पुरेसा साठा दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेळीपालन व्यवसायातून मोठ्या संख्येने उत्पन्न प्राप्त होते. तसेच अनुदानही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.